Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
अ.नगरराजकीय

ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपर वरच निवडणुका घ्या! सिमोन ठकाजी जगताप

शिर्डी ( प्रतिनिधी) सध्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका पार पाडल्या .त्या ईव्हीएम मशीन द्वारे निवडणुका घेण्यात आल्या. मात्र अनेक ठिकाणी मशीन बाबत साक्षमता निर्माण झाली असून तशी चर्चा राज्यात सुरू आहे. अनेकांनी येथून पुढील सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर (मतपत्रिकेवर) घेण्याचे मागणी केली आहे.
अशी मागणी यापूर्वीच 30 डिसेंबर 2024 रोजी राहता तालुक्यातील निमगाव कोराळे येथे झालेल्या ग्रामसभेत ठरावाद्वारे करण्यात आली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


‌ राहता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे ग्रामपंचायत असून येथे 30 डिसेंबर 2024 रोजी ग्रामसभा संपन्न झाली.
या सभेमध्ये ईव्हीएम मशीन ऐवजी सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. अशी मागणी करण्यात आली होती.
सिमोन ठकाजी जगताप यांनी ग्रामसभेत याविषयी सूचना केली,व शामकांत भाऊसाहेब कातोरे यांनी त्यास अनुमोदन दिले होते .त्यावर उपस्थित ग्रामस्थांमध्ये साधक बादक चर्चा होऊन हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता.

या ग्रामसभेतील ठराव क्रमांक पाच तीन नुसार हा ठराव संमत झाला. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावेत.अशी मागणी निमगाव कोऱ्हाळे ग्राम सभेत करण्यात आली होती व ती मंजूर झाली होती. ग्रामस्थांचे म्हणणे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असेच होते. असे यावरून दिसते. पण ही मागणी शासनाने, निवडणूक आयोगाने मनावर घेतली नाही.

त्यामुळे झालेल्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन वर अनेक ठिकाणी संशय निर्माण होत आहे. तशी चर्चा होत आहे. जर ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवर या निवडणुका झाल्या असत्या तर अशी सरकार ,व निवडणूक आयोग याविषयी संशयास्पद भूमिका नागरिकांची राहिली नसती.

येथून पुढील निवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात . यात निवडणूक आयोगाची अडचण काय आहे? असा सवालही त्यांनी केला असून येणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपर वरच घेण्यात याव्यात. अशी परत एकदा मागणी सिमोन ठकाजी जगताप यांनी प्रसिद्धीला दिलेल्या एका पत्रकाद्वारे केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button