
वाहन चालवणे ही एक जबाबदारीची आणि काळजीपूर्वक पार पाडावी लागणारी प्रक्रिया आहे. रस्त्यावरील वाहनाची गती, वाहतुकीचे नियम, आणि सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी याचा एकत्रित विचार केला तर आपण स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनासाठी महत्त्वाचा वाटा उचलू शकतो. रस्त्यावर कोणतेही वाहन चालवताना आपल्या वाहनाच्या गतीचा समतोल राखणे अतिशय महत्त्वाचे असते. वाहनाची गती योग्य नसेल तर अपघात होण्याची शक्यता वाढते. गतीच्या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे:
१) रस्त्याचा प्रकार आणि गती मर्यादा:
शहरांमध्ये सामान्यतः ३० – ५० किमी प्रतितास ही गती सुरक्षित मानली जाते.तर महामार्गावर ८० – १२० किमी प्रतितास अशी गती मर्यादा ठरवलेली असते,
दुर्गम भागांमध्ये कमी गती ठेवणे योग्य असते कारण रस्ते अरुंद किंवा खराब असतात,
२) गतीमुळे होणारे अपघात:
अति वेग: गाडीचा अति वेग नियंत्रणापलीकडे जाऊ शकतो, ज्यामुळे अचानक ब्रेक मारणे किंवा वळणे कठीण होते. करीता अल्प वेग: आवश्यक असते मात्र वेगापेक्षा खूपच कमी वेगाने वाहन चालवल्यास मागून येणाऱ्या वाहनांमुळे टक्कर होण्याचा धोका वाढतो.
३) गती नियंत्रणाचे फायदे:
प्रथमतः आपल्या वाहनांचे इंधन बचत होते,वाहनाचे ब्रेक आणि टायरचे आयुष्य वाढते, आपल्यासह सहप्रवाशांना आरामदायक प्रवासाचा सुखद अनुभव ही मिळतो.
वाहन चालवताना घ्यावयाची काळजी
वाहन चालवताना चालकाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव असणे गरजेचे आहे. खालील बाबी ध्यानात ठेवून वाहन चालवल्यास सुरक्षितता सुनिश्चित होऊ शकते.
१) वाहन चालवण्यापूर्वीची तयारी:
सर्वप्रथम आपल्या वाहनाची तपासणी करणे आवश्यक असते.त्यात आपल्या वाहनाच्या टायर्स मधील टायरचा हवेचा दाब, ब्रेक्स, लाइट्स,आणि इंधन पातळी तपासणी करणे क्रमप्राप्त ठरते. यासोबतच वाहन संबंधी योग्य कागदपत्रे उदा. वाहन चालविण्याचा परवाना,वाहनाचा विमा, पीयुसी सर्टिफिकेट,आणि इतर आवश्यक कागदपत्रे आपल्या वाहनातच (जवळ) असणे गरजेचे असते.
यासोबतच शारीरिक आणि मानसिक तयारी खुपच महत्वाची ठरते, वाहन चालविताना थकवा आला असेल किंवा मद्यपान केले असेल तर थकलेले किंवा मद्यपान केलेले अवस्थेत कदापी वाहन चालवू नये, मद्यपान करुन वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा ठरतो शिवाय थकवा जाणवत असेल किंवा झोप येत असेल तर अपघातास कारणीभूत देखील ठरतो.
२) वाहन चालवताना घ्यावयाची काळजी:
अचुकपणे वाहन चालवणे, वेळेवर ब्रेक लावणे, समोरील (पुढील) वाहनाशी सुरक्षित अंतर राखणे,आणि वेळोवेळी ब्रेक्सचा योग्य वापर करणे.
वाहनाची गतीमर्यादा पाळा:
रस्त्यावर दिलेल्या गतीच्या मर्यादेचे तंतोतंत पालन करावे,तथा शहरात किंवा इतर महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्यावरील सिग्नलचे पालन करणे खुपच आवश्यक आहे,लाल सिग्नलवर थांबावे आणि हिरवा सिग्नल मिळाल्यावरच आपले वाहन पुढे चालवत न्यावे, यासोबतच वाहन चालवताना रस्ते वाहतुकीचे जे
मुलभूत नियम असतात त्याचे देखील परिपूर्ण पालन हे झालेच पाहिजे.करीता वाहन चालवताना नेहमी
सीटबेल्ट चा वापर करावा आणी दुचाकी चालवताना हेल्मेट घालावे,कोणतेही वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर टाळावा,
३) रस्त्याच्या स्थितीची काळजी:
पावसाळ्यात: रस्ते ओले आणि निसरडे असल्यामुळे आपल्या वाहनाची गती कमी ठेवावी,धुक्यात असल्यास आपल्या वाहनाच्या फॉग लाईटचा वापर करावा आणि अतिशय कमी गतीने आपले वाहन चालवावे,उंचावरचे रस्त्यावर किंवा वळणांवर अत्यंत जपूनच वाहन चालवावे,
अपघात रोखण्यासाठी विशेष उपाय
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी खालील गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.
१) तांत्रिक उपाय:
आधुनिक ब्रेकिंग सिस्टमचा वापर (ABS – Anti-lock Braking System).,
वाहनातील सेन्सर्स आणि कॅमेऱ्यांचा योग्य वापर करणे
२) वाहतूक नियमन:
वाहन चाचणी (Pollution Check) वेळच्या वेळी करणे,
३) रस्ता सुरक्षा अभियानद्वारे अभियानातून वाहन चालकांची जनजागृती
दरवर्षी जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकारी, पोलिस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग,आरोग्य विभाग, विविध सेवाभावी संस्था आदिंच्या माध्यमातून
नवीन चालकांसाठी विशेष वाहतूक नियम प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे शाळा आणि महाविद्यालय, साखर कारखाने, पोलिस स्टेशन, मार्केट यार्ड,तथा रस्त्यावरील मोक्याच्या ठिकाणी, चौकांमध्ये रस्ते सुरक्षिततेविषयी उपक्रम राबविले जातात, यामधील शिबीरांद्वारे वाहन चालकांची आरोग्य तपासणी,डोळे तपासणी, रक्तदान, तथा विविध विषयांकित वाहतूक नियमांची माहिती दिली जाते. सध्या दिनांक १ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यानं केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२५ ‘pravaah or care” या श्लोगनखाली राबविले जात आहे,
यामध्ये वाहन चालकांसह खरेतर सर्वांनीच अशा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहिले पाहिजेत. ज्यामुळे वाहतूकीच्या नियमांविषयी तथा खबरदारी घेण्याविषयी खरेतर ज्ञानात अधीकच भर पडेल.
चालकाची मोठी जबाबदारी
वाहन चालकाच्या वागणूकीवर वाहन चालवण्याची सुरक्षितता अवलंबून असते करीता खालील दर्शविण्यात आलेया जबाबदाऱ्या या प्रत्येक चालकाने पाळल्या पाहिजेत:
१) स्वतःच्या सुरक्षिततेसाठी:
वाहन चालविताना दुचाकी साठी नेहमी हेल्मेटचा वापर करावा आणी इतर वाहनांसाठी सीटबेल्ट वापर करावा.डोळ्यांना थकवा येईल अशा स्थितीत वाहन चालवू नका.
२) इतरांच्या सुरक्षिततेसाठी:
पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी वेळ द्यावा,
इतर वाहनचालकांसोबत संयमाने वागावे,वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे.यासोबतच अपघातग्रस्तांसाठी आपत्कालीन सेवा उपलब्ध करणे महत्त्वाचे ठरते.
रस्त्यावर वाहन चालवताना गती आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केल्यास अपघातांची शक्यता कमी होते. प्रत्येक चालकाने स्वतःची जबाबदारी ओळखून योग्य काळजी घेतली तर रस्ते अधिक सुरक्षित होतील. त्यामुळे “सुरक्षित वाहन चालवा,जबाबदार नागरिक बना” ही भावना प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे आहे.
लेखन
शौकतभाई शेख
(सामाजिक कार्यकर्ते)
श्रीरामपूर – 9561174111