Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
राजकीयशिर्डी

राहाता येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी पाठपुरावा वेगात-डॉ. राजेंद्र पिपाडा यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निधी मंजुरीची विनंती

राहाता : राहाता व परिसरातील नागरिक तसेच शिर्डीत येणाऱ्या हजारो भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने राहाता येथे सर्व सुविधांनी युक्त उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे तातडीने मान्यता व निधी मंजूर करण्याची विनंती केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


प्रस्तावित रुग्णालयात नागरिकांना मार्गदर्शन मिळावे यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष (Help Desk) उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग बांधवांसाठी सुलभ रॅम्प व लिफ्टसह प्रवेशव्यवस्था, पुरेशी वाहनतळ (पार्किंग) सुविधा, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्रशस्त प्रतीक्षा कक्ष उभारण्यावरही भर देण्यात आला आहे.


डॉ. पिपाडा यांनी निवेदनात नमूद केले आहे की, राहाता तालुका व शिर्डी परिसरात दररोज मोठ्या संख्येने नागरिक व भाविकांची वर्दळ असते. आपत्कालीन परिस्थितीत तातडीची व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि जीविताचा धोका वाढतो.


उपजिल्हा रुग्णालय उभारल्यास स्थानिक नागरिकांना वेळेवर उपचार मिळतील, गर्भवती माता, ज्येष्ठ नागरिक आणि अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ मदत मिळेल तसेच मोठ्या शहरांवरील आरोग्य व्यवस्थेवरील ताणही कमी होईल.
या मागणीस शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर निधी मंजूर करावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button