Letest News
ठकसेन भोप्यासह त्याचे चुलते वडील भाऊ व इतर दोघांवर शिर्डी पोलीस स्टेशनला एकूण 21 लोकांनी केला गुन्हा... श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी ‘ब्रेक दर्शन’ सेवा बंद राहणार श्री साईबाबा संस्थान, शिर्डी चे वतीने आज आषाढी एकादशी हा स्‍थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा हरीनामाने दुमदुमली 15 चारी भक्तिमय वातावरणात बालगोपाळां सह शिक्षकांनी पावली वर धरला ठेका श्री. साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांच्‍या प्रयत्‍नांनी उतरला “डोक्यावरील गाठीचा डोंगर!” सावळे कुटुंबियांनी संघटित गुन्हा केलेला असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी मधला अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला 19 वर्षांनंतर ठाकरे एकत्र अख्खा महाराष्ट्र वाट पाहत होता ह्या क्ष... shirdicrimenews ठकसेन भोप्या साळवे याच्या अर्चणीत वाढ़ राहाता येथेही गुन्हा दाखल साईबाबा मंदिरातून सोन्याचे कडे चोरी गेले किंवा गहाळ झाल्याने शिर्डी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या वि... पोलीस अधीक्षकसह शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी ऍक्शन मोड मध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला केले हद...
अ.नगरक्राईम

बीड जिल्ह्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातही अवैध धंद्यामुळे वाढली गुन्हेगारी!

शिर्डी ( प्रतिनिधी) बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांप्रमाणेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी कडक निर्णय घेणे महत्त्वाचे असून अवैध धंद्यांच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक कधी ॲक्शन मोडवर येणार? असा सवाल जिल्ह्यातील नागरिकांकडून आता होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाल्मिक कराड याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या समर्थकांनी आंदोलने केली आहेत. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ वाढल्याचं दिसून आलं आहे. मराठा आणि वंजारी समाज यांच्यात आरक्षणावरून आधीच काही संघर्ष असताना संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे प्रकरण आणखी तापताना दिसत आहे.

अशातच जातीय तेढ वाढू नये यासाठी बीडचे एसपी नवनीत काँवत यांनी कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देत एकप्रकारे इशाराही दिला आहे.पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी यांना शिस्त लावण्यासाठी, त्याचबरोबर जातीयवाद नसावा यासाठी, आता प्रयत्न सुरू केले आहेत.

यापुढे अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना हाक मारताना, त्यांच्या आडनावाऐवजी थेट नावाने हाक मारावी. वर्दीवर असताना रील्स काढून सोशल मीडियावर टाकल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे, त्याचबरोबर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप झाला तर ठाणेप्रमुखाची थेट नियंत्रण कक्षात बदली केली जाईल.

अशा सूचना देत थेट इशारा देखील, यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्याप्रमाणेच अहिल्या नगर जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही असे काही धाडसी निर्णय घेतले पाहिजेत. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंदे तेजीत सुरू आहेत. व त्यातूनच गुन्हेगारी वाढत जाते. बीड जिल्ह्याचे वातावरण व तेथील परिस्थिती लक्षात घेता अहिल्यानगर जिल्ह्यातही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कडक धोरण स्वीकारले पाहिजे.

बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कधी ॲक्शन मोडवर येणार असा सवाल आता जिल्ह्यातील नागरिक करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध दारू धंदे मटका जुगार अवैध वेश्या व्यवसाय अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अवैध धंद्यातून मिळालेल्या पैशावर दादागिरी गुंडगिरी मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे जिल्ह्यातील हे अवैध धंदे कधी बंद होणार जिल्हा पोलीस अधीक्षक कधी ॲक्शन मोडवर येणार असा सवाल जिल्ह्यातील नागरिक करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button