Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
राजकीयशिर्डी

दर्शनापुरती उरली-शिर्डी विकास शून्य-राजकारण शंभर टक्के!-जेष्ठ न्यायाविधीतज्ञ् तथा माजी उपनगराध्यक्ष अनिल जी शेजवळ

शिर्डी ही साईबाबांची पवित्र भूमी आहे. पण आज या भूमीत श्रद्धेपेक्षा अराजक, सेवाभावापेक्षा स्वार्थ आणि विकासाऐवजी राजकारण दिसत आहे. साईबाबांच्या नावावर जगणारी साईनगरी आज हळूहळू ओस पडत चालली आहे, आणि हे कुणाच्या लक्षात येत नाही — किंवा येऊनही मुद्दाम दुर्लक्ष केलं जात आहे.
आज वास्तव असं आहे की भाविक शिर्डीकडे पाठ फिरवत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


कारण काय?
साईबाबा बदलले? नाही.
भाविकांची श्रद्धा कमी झाली? नाही.
मग दोष कुणाचा? — इथल्या व्यवस्थेचा, प्रशासनाचा आणि स्थानिक राजकारणाचा.
नागर–मनमाड रस्ता म्हणजे शिर्डीचा श्वास. पण आज तो रस्ता नाही, तो मृत्यूचा सापळा बनला आहे. खड्डे, धूळ, अपघात आणि त्रास — या सगळ्यांतून भाविकांना शिर्डीत यायचं आहे. हा रस्ता पाहून भाविक म्हणतात, “दर्शनापेक्षा प्रवासच जास्त शिक्षा

आहे.” याला जबाबदार कोण?
👉 रस्ते खातं?
👉 लोकप्रतिनिधी?
👉 की साईबाबांच्या नावावर फक्त फोटो काढणारे पुढारी?
याहून भयानक वास्तव म्हणजे —
शिर्डीत दर्शनाव्यतिरिक्त शून्य विकास.
भाविक आला, रांगेत उभा राहिला, दर्शन घेतलं आणि लगेच निघून गेला.
का?


कारण इथे थांबावं असं काहीच नाही.
ना पर्यटन, ना स्वच्छता, ना नियोजन, ना सुसंस्कृत शहराचा अनुभव.
इतर तीर्थक्षेत्रे बघा — तिथं भाविक देवासोबत शहरावर प्रेम करून परत जातो.
शिर्डीत मात्र भाविक त्रास, लूट आणि अस्वस्थता घेऊन परत जातो.
आज शिर्डीमध्ये विकासाचा नाही तर सत्तेचा खेळ सुरू आहे.


नगरपालिका, अधिकारी, नेते — सगळे आपापल्या खुर्चीच्या भोवती फिरत आहेत.
साईभक्त, व्यापारी, स्थानिक नागरिक — यांचं भविष्य कुणाच्याच अजेंड्यावर नाही.
आज स्पष्ट शब्दांत सांगतो —
ही स्थिती बदलली नाही, तर शिर्डी भाविकांचं नव्हे तर फक्त बोर्डावरचं तीर्थक्षेत्र उरेल.
आणि तेव्हा दोष देण्यासाठी साईबाबा नसतील —


दोषी असतील आपणच.
साईबाबा हे कुठल्याही पक्षाचे नाहीत.
पण आज त्यांच्या नावावर अपयश झाकलं जात आहे.
राजकारण बाजूला ठेवा, नाहीतर उद्या शिर्डी वाचवायला कोणी उरणार नाही.
हा लेख इशारा आहे.
आज नाही जागे झालो, तर उद्या साईनगरीचं अस्तित्व प्रश्नात येईल.
जय साईराम.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button