Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
क्राईमशिर्डी

शिर्डीत मानपानाच्या नावाखाली नवविवाहितेचा छळ- पतीसह सहा जणांवर गुन्हा!

शिर्डी : लग्नातील मानपानाच्या नावाखाली एका नवविवाहितेवर अमानुष अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हुंडा व पैशांच्या हव्यासापोटी पतीसह सासरच्या मंडळींनी केलेल्या छळामुळे अखेर पीडितेला घराबाहेर काढण्यात आले असून, या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, १६ मे २०२५ रोजी शिर्डीत थाटामाटात विवाह पार पडला. मात्र लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच खरी परिस्थिती समोर आली. “मानपान मिळाला नाही, दोन तोळे सोने नाही, तुझे वडील निकम्मे आहेत” अशा अपमानास्पद शब्दांत सतत मानसिक छळ सुरू झाला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


याचबरोबर व्यवसायासाठी ५ लाख रुपये आणण्याचा दबाव टाकत विवाहितेला वारंवार त्रास देण्यात आला. पैसे न आणल्यास मारहाण, अपमान आणि उपेक्षा अशी वागणूक देण्यात येत होती. इतकेच नव्हे, तर चारित्र्यावर संशय घेऊन “हे लग्न जबरदस्तीने झाले” असे म्हणत तिच्या सन्मानालाच तडा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सततचा छळ असह्य झाल्यानंतरही संसार टिकवण्याच्या आशेने पीडिता सहन करत राहिली. मात्र दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी तिला निर्दयीपणे घरातून बाहेर हाकलण्यात आले, आणि तिच्या आयुष्याला मोठा धक्का बसला.
या घटनेनंतर पीडितेने धाडस दाखवत संभाजीनगर कौटुंबिक न्यायालयात घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली. तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १४४(१) अन्वये पती अक्षय निर्मळ, सासू-सासरे, नणंद व इतर नातेवाईक अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


📢 संतप्त प्रतिक्रिया:
👉 “मानपानाच्या नावाखाली छळ कधी थांबणार?”
👉 “हुंड्याच्या लालसेने किती आयुष्ये उद्ध्वस्त करणार?”
👉 “अशा आरोपींवर कठोर शिक्षा व्हायलाच हवी!”
⚠️ इशारा:
लग्नातील मानपान, हुंडा किंवा पैशांसाठी होणारा छळ हा केवळ सामाजिक कलंक नाही, तर गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अन्यथा अशा विकृत प्रथा समाजात वाढतच राहतील.
👉 एकच संदेश – “छळ सहन करू नका, आवाज उठवा!”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button