Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
राजकीयशिर्डी

लोकक्रांती सेना पुरस्कृत स्वाभिमानी शिर्डी आघाडी कडून प्रभाग ६ (अ) मध्ये ताराचंद नाना शेजवळांची दमदार एन्ट्री — बदलाचा बिगुल वाजला!

प्रभाग क्रमांक ६ (अ) मधून लोकक्रांती सेना पुरस्कृत स्वाभिमानी शिर्डी आघाडी कडून ताराचंद नाना शेजवळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी प्रभागातील वर्षानुवर्षे रखडलेल्या समस्यांना प्राधान्य देत व्यापक बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

sai nirman
जाहिरात

ताराचंद नाना म्हणाले, “रस्ते, पाणी, गटार, लाईट आणि स्वच्छता—या मूलभूत सुविधांची अवस्था बिकट आहे. बदलाची गरज लोकांनी अनेक वर्षे अनुभवली, आता हा बदल करून दाखवण्याची जबाबदारी मी स्विकारली आहे.”

प्रभागातील असमान पाणीपुरवठा, गटारव्यवस्थेचा ऱ्हास आणि जीर्ण रस्ते या तातडीच्या समस्यांवर ते पहिल्या १०० दिवसांत ठोस कामे करण्याच्या भूमिकेत आहेत. सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, गटारलाइनचा संपूर्ण बदल व स्वच्छतेसाठी कडक यंत्रणा उभारणे हा त्यांचा पहिला कार्यक्रम असेल.

DN SPORTS

स्वाभिमानी शिर्डी आघाडीची निवड का करावी, यावर बोलताना त्यांनी सांगितले, “ही आघाडी सत्तेच्या राजकारणापेक्षा जनतेला केंद्रस्थानी ठेवते. जेष्ठ नेते बाबूजी पुरोहित यांचे मार्गदर्शन आणि युवा नेतृत्वामुळे पारदर्शी व गटबाजीविरहित प्रशासन शक्य आहे.”

तरुणांसाठी क्रीडा व कौशल्यविकास सुविधा, महिलांसाठी सुरक्षा आणि स्वयं-सहायता गटांना पाठबळ तसेच प्रभागातील स्वच्छता मोहिमेला गती देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

“मी निवडून आलो तर माझे दार नागरिकांसाठी नेहमी खुले असेल. मी ऑफिसमध्ये बसणारा नव्हे तर लोकांमध्ये फिरून तक्रारी तत्काळ सोडवणारा प्रतिनिधी असेन,” असे ते म्हणाले.

शेवटी ताराचंद नाना शेजवळ यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले, “मी वचन नव्हे—काम देण्याच्या भूमिकेत आलो आहे. प्रभाग ६ (अ) चा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे.”

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button