Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
शिर्डी

अनेक हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये मोफत साधे ,स्वच्छ पाणी देण्याऐवजी बाटलीबंद पाण्याची अप्रत्यक्षपणे केली जाते सक्ती!

शिर्डी (प्रतिनिधी)
सध्या बाटलीबंद पाण्याचा जमाना आल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.इतर शहराप्रमाणे शिर्डीतही काही हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर आपल्यासमोर बाटलीबंद पाणी दिले जाते. खरं तर टेबलवर एक साधं व स्वच्छ पाणी जग आणि ग्लास अशी सोय करणे आवश्यक आहे. तसा नियम आहे. परंतु अधिक पैसे मिळवण्यासाठी विनाकारण बाटली बंद पाणी घेण्याची शक्ती जणू अप्रत्यक्षपणे अश्या हॉटेलमध्ये केली जात असल्याचे चित्र अनेक ठिकाणी ‌येथे पाहायला मिळते. प्रत्येक हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये प्यायचं साधं पाणी ग्राहकांना देणे बंधनकारक आहे आणि ते दिले नाही तर त्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करता येते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

असे असतानाही अनेक हॉटेल रेस्टॉरंट मध्ये साधे पाणी न देता बाटलीबंद पाणी टेबलवर ठेवून ते अप्रत्यक्षपणे ग्राहकांना खरेदी करण्याची जणू सक्तीच होत असल्याचे चित्र दिसत असून त्यावर औषध प्रशासन कारवाई करणार का? असा संवाल करत आठवड्यातून एकदा तरी अन्न व औषध प्रशासनाने येथे पथके पाठवून अशा हॉटेलवर छापे टाकावेत व ग्राहकांना बाटलीबंद पाणी विक्री करून होणारी लूट थांबवावी. अशी मागणी शिर्डी नगरपरिषदेचे नगरसेवक सुरेश काळू आरणे यांनी केली आहे.

kamlakar


सुरेश आरणे यांनी म्हटले आहे की, बाटलीबंद पाणी खरेदी केले तर पैसे जातात तसेच पाणी पिल्यानंतरही ही रिकामी बाटली कचरा ठरते. या रिकाम्या बाटली मुळे प्रदूषण वाढते. पुण्यामध्ये अशी सक्ती हॉटेल रेस्टॉरंट मध्ये होऊ नये म्हणून गोखले इन्स्टिट्यूट मधील सेंटर ऑफ सस्टेनेबल या सेंटरकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्लास्टिक ची बाटली करताना रासायनिक पदार्थ वापरले जातात. त्याचे लिंचिंग होते. प्लास्टिकचे केवळ दोन ते तीन वेळा रिसायकलिंग होते. नंतर ते इतके कमकुवत होते की त्याचे काहीच करता येत नाही. ते कचरा म्हणून पर्यावरणात राहते. त्याचे विघटन होत नाही. पण तुकडे होत राहतात .ते सगळीकडे माती नदी समुद्र यातून आपल्या अन्नसाखळीत प्रवेश करतात. त्यामुळे हा सर्व प्रकार बंद व्हावा म्हणून साधे व स्वच्छ पाणी हॉटेल रेस्टॉरंट मधून जग मधून देणे महत्त्वाचे आहे. आता अनेक ठिकाणी बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ पाणी मोफत मिळते.

मग त्याचप्रमाणे हॉटेल रेस्टॉरंट मधून ते मिळावे. तसा अन्न औषध प्रशासनाचा नियम आहे .मात्र हा नियम डावलून पैशासाठी बाटलीबंद पाणी जाणीवपूर्वक विक्रीसाठी ठेवले जाते. ग्राहक हॉटेलमध्ये आल्यानंतर बाहेर जात नाही. त्यामुळे प्रत्येक हॉटेल रेस्टॉरंट मध्ये येथे स्वच्छ मोफत पिण्याचे पाणी सुद्धा मिळेल असा फलक लावावा. जर असे नसेल तर अशा हॉटेल रेस्टॉरंट वर कारवाई व्हावी अशी मागणी सुरेश काळू आरणे यांनी केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button