Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
Blog

संपूर्ण जगाला श्रद्धा सबुरीचा व सर्व धर्म समभावाचा संदेश देणारे श्री साईबाबा ईश्वरी अवतार होते- जगद्गुरु अरुणगिरीजी महाराज

शिर्डी( प्रतिनिधी)
संपूर्ण जगाला श्रद्धा सबुरीचा व सबका मालिक एकचा संदेश देणारे आणि सर्वधर्मसमभावाचा उपदेश करणारे शिर्डीचे साईबाबा साक्षात ईश्वरी अवतार होते. साई दर्शनासाठी देश-विदेशातून सर्व जाती-धर्माचे , पंथाचे लोक येतात . पण काही लोक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी बाबांविषयी काहीतरी बोलून जातात. हे योग्य नाही. असे परखड मत अरुण गिरीजी महाराज यांनी दैनिक साई दर्शन शी बोलताना व्यक्त केले.
महान संत अरुण गिरीजी महाराज यांनी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


यावेळी अरुण गिरीजी महाराज पुढे म्हणाले की, संपूर्ण जगाला श्रद्धा सबुरी चा मूलमंत्र देणारे शिर्डीचे साईबाबा एक महान संत होते. त्यांनी संपूर्ण जगातील लोकांना मानवतेचा संदेश दिला. सर्वधर्मसमभावाचा मंत्र देऊन संपूर्ण जगातील लोकांना आपण सर्व ईश्वराची लेकरे आहोत. त्यामुळे मिल जुलकर राहण्याचा त्यांचा हा संदेश सर्वत्र शांतता ठेवण्यासाठी आजही महत्त्वाचा ठरत आहे. साईबाबांनी लोकांना धर्म, समाज म्हणून एकमेकात तेढ निर्माण करू नये. कोणतेही जात पंत धर्म हा चांगला संदेश देतो .त्यामुळे आपापसात जात धर्म पंथ असा भेदभाव करून एकमेकात भांडणे करू नये . असाच त्यांचा भाव व संदेश या त्यांच्या मूलमंत्रांतून होता. साईबाबांनी दिलेल्या मूलमंत्रांचे आचरण करत आपण जीवन चांगल्या मार्गाने जगले पाहिजे सर्वत्र शांती, प्रेम , सहानुभूती मानवता ठेवली पाहिजे.

साईबाबांनी हयात असताना पशुपक्ष्यांची, रुग्णांची सेवा केली झाडे लावून त्यांची निगा राखली. तेव्हा प्रत्येकाने पशुपक्षी यांच्यावर दया केली पाहिजे. पर्यावरण राखले पाहिजे. रुग्णसेवा केली पाहिजे. आपण सर्व ईश्वराचे लेकरे आहोत .असे समजून प्रत्येकाशी चांगले वागले पाहिजे. हाच त्यांचा खरा संदेश होता. असे जगद्गुरु अरुण गिरीजी महाराज यांनी दैनिक साईदर्शनशी बोलताना सांगितले.

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button