Letest News
जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाचा धडाका- १५५ प्रकरणांत हस्तक्षेप-वर्षभरात ७ गुन्हे दाखल-अनेक विव... शेळके दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू- हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार सिन्नरचा दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर- २५ मालमत्तांची माहिती समोर! शिर्डीत कथित धर्मांतर प्रकरणाने खळबळ-डि मार्ट मॉलमधील घटनेवरून वाढली चर्चा “मी नाही त्यातला!” – दीपक लोंढेची तीच जुनी पिपाणी, चौकशीत मात्र वेगळंच चित्र-लोंढेंच्या दाव्यांवर प्... शिर्डीत ‘मुंबई बिर्याणी’चा घाणेरडा खेळ उघड! बिर्याणीत गुटख्याची पुडी – खवय्यांच्या आरोग्याशी खिलवाड टपऱ्या हटवा-अन्यथा रस्त्यावर उतरू! – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा अतिक्रमणाविरोधात मनसेचा एल्गा... 🏅 शिर्डीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचा राज्यस्तरीय सन्मान 🚨 डॉ. जितेंद्र शेळके प्रकरणावरून शिर्डीत संतापाची लाट सोशल मीडियावरील आरोपांवर नागरिक आक्रमक दुर्दैवाचा दुहेरी घाव… शिर्डीचा लाडका भूमिपुत्र जितेंद्र शेळके यांच्यासह पत्नी अनुराधाताई यांचीही मृ...
अ.नगरराजकीय

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच शिर्डी व परिसरातही क्रिकेटच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत केला जल्लोष!

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच शिर्डी व परिसरात क्रिकेटच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला. दुबई येथे झालेल्या या क्रिकेट स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात विजय मिळवताच देशात सर्वत्र मोठा आनंद साजरा करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या अंतिम सामन्यात रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी केली आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले. रोहित शर्माच्या चाणाक्ष नेतृत्वामुळे भारताने न्यूझीलंडला २५१ धावांत रोखले. भारतीय संघ विजयासाठी २५२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि त्यानंतर रो’हिट’ शो सर्वांना पाहायला मिळाला. कारण रोहित शर्माने एकहाती तुफानी फटकेबाजी केली आणि भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

श्रेयस अय्यरनेही यावेळी ४८धावा केल्या खऱ्या, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. पण तरीही भारताने हा सामना जिंकला. भारताचे हे तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद आहे. त्याचबरोबर भारताने न्यूझीलंडचा २५ वर्षांपूर्वीचा बदला या विजयासह घेतला आहे. कारण २००० साली न्यूझीलंडने भारताला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारताने यावेळी चार विकेट्स राखून न्यूझीलंडला पराभूत केले आणि विजेतेपद आपल्या नावावर केले.


न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला खरा, पण पहिल्याच षटकापासून रोहित शर्माने आपले इरादे स्पष्ट केले होते. यावेळी शुभमन गिल हा फक्त रोहित शर्माची फटकेबाजी पाहण्याचे काम करत होता. कारण रोहित शर्मा आपल्या पोतडीतून एकामागून एक फटके काढत होता.

रोहित शर्माने आपले अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करायला लागला होता. रोहितला श्रेयस अय्यर चांगली साथ देत होता. पण यावेळी फिरकीपटूंनी या दोघांवर दडपण आणले आणि रोहित शर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. रोहितने यावेळी सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७६ धावांची दमदार खेळी साकारली.रोहित बाद झाल्यावर श्रेयस अय्यरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली

आणि तो संघाची धावगती वाढवण्याचा प्रयत्न करत होता. पण या नादात त्याने मोक्याच्या क्षणी आपली विकेट बहाल केली. श्रेयसने यावेळी ४८ धावा केल्या. श्रेयस बाद झाल्यावर अक्षर पटेल सेट झाला होता. पण त्यानेही मोठा फटका मारत आपली विकेट सोडली, त्याने २९ धावांची भर टाकली. पण त्यानंतर लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने अंतिम सामन्यात विजय मिळवताच देशात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला. शिर्डी व परिसरातही फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button