Letest News
मतदारांनो सावधान! SIR-2026 अंतर्गत घरभेटीला सहकार्य करा-नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात यांचे आवाहन शिर्डीत नाही-थेट मुंबईत धाव…! योगेश तिया यांच्या फिर्यादीभोवती संशयाचे धुके-खंडणीचा गुन्हा आधी की बल... वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे
राजकीयशिर्डी

दीपक केसरकरांचा मनोज जरांगे पाटलाना थेट सल्ला ..

शिर्डी : मनोज जरांगे पाटलांनी आपल्या उपोषणातून जे मिळावले ते आपल्या भाषणातून गमवायला नकोय. मराठा आरक्षणाचे सगळे श्रेय जरांगे पाटलांना मिळायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना मराठा आरक्षण बाबत दिलेल्या शब्द पूर्ण होतो का नाही. तो पर्यंत तरी जरांगे पाटलांनी संयम ठेवायला पाहिजे असल्याच थेट सल्ला शालीय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी जरांगे पाटलांना दिलाय.

sai nirman
जाहिरात

शालीय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी १८ नोहेंबर रोजी शिर्डीत येवुन साई मंदिरात जावुन साई समाधीचे दर्शन घेतले आहे. यावेळी केसरकर यांनी साईबाबांची दुपारची माध्यन्ह आरतीलाही हजेरी लावलीय. साईबाबांच्या आरतीनंतर केसरकर यांनी साईबाबांच्या समाधीवर पिवळ्या रंगाची शॉल चढवत साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलंय. साईबाबांचे दर्शन घेवून मंदिराबाहेर आल्यानंतर केसरकर यांनी मंदिर परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय.

मराठा आरक्षणावर बोलतांना केसरकर यांनी, ओबासीच्या आरक्षणाला धक्का न लावता,मराठा समाज्याला आरक्षण देण्याच्या भूमिकेत सरकार आहे. त्यामुळे आता जरांगे पाटलांनी राज्यात दौरे करणे कितपत योग्य आहे. याचा विचार जरांगे पाटलांनी केला पाहीजे, शेवटी प्रत्येक एक्शनला रिँक्शन असते. त्यामुळे दोन्ही कडुन जे सुरू आहे ते थांबवले पाहीजे. कोणीही एकमेकां विरुद्ध स्टेटमेट करु नये. शेवटी जातीय सलोखा कायम राहीला पाहीजे, असे मत शालीय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केले.

DN SPORTS

सामाजिक वातावरण कुलीशीत करण, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. जातीय सलोखा राखण्याची परंपरा, छत्रपती शिवाजी महारांजांनी महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवुन,जातीय सलोखा बिघडविल्या जाणं हे दुर्दैवी असून. त्याच्या सारख दुसरं दुःख कोणतेही नाही, असेही यावेळी दिपक केसरकर म्हणाले आहे. आपल्याला समाज्याचे जर हिताचे करायचे असेल तर समाज्यात कशी गरिबी आहे. याच रेकॉर्ड तयार करायला पाहीजे तरच न्याय मिळु शकतो. एकीकडे न्याय मागायचा दुसरीकडे न्याय मिळण्यासाठी मदत करायची नाही. असे कोणाकडूनही घडूनये अश्या शब्दात केसरकर यांनी जरांगे पाटील यांचे नाव न घेता टीका केलीय.

भाजपा नेते राम कदम यांनी ट्विट करत मातोश्री बाळासाहेबांचे स्मारक करावे होते. यावर दिपक केसरकर बोलतांना म्हणाले की ही आमची किव्हा युतीची मागणी नाही , ही त्यांची व्यक्तीत मागणी असल्याचही यावेळी केसरकर म्हणाले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button