Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
अ.नगरराजकीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिपाडा कुटुंबाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले

उभे आयुष्य देशहितासाठी झिजवून तळागाळातील तसेच सर्वच स्तरातील घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. अशी प्रतिक्रिया डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी बोलताना व्यक्त केली. भारतीय संविधानचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिपाडा कुटुंबाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यावेळी माजी आमदार ओमप्रकाशजी पोखरणा, डॉ. राजेंद्र पिपाडा, महावीर पिपाडा, सचिन शिंदे आदि उपस्थित होते. संपूर्ण देशभर 6 डिसेंबर हा दिवस बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो.यावेळी पुढे बोलताना डॉ. पिपाडा म्हणाले की, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजच्या पिढीसाठी एक आदर्शच आहे. बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत असून त्यांची शिकवण अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत असणार आहे. सवर्ण, शूद्र, उच्च आणि नीच अशी सामाजिक दरी भ्रूण काढत शिक्षणाचा समान हक्क मिळवून देण्याचा कायदा बाबासाहेबांनी आणला.

देशाला त्यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे आज अनेक मागास आणि वंचित घटकतील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. थोर समाजसुधारक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांनी भारतातील तळागाळातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्न केले. मागासवर्गाच्या हितांसाठी ‘स्वतंत्र मंजूर पक्ष’ या पक्षाची स्थापना केली होती. सप्टेंबर 1947 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणू डॉ. आंबेडकरांनी शपथ घेतली.

सामाजिक भेदभाव निर्माण करणाऱ्या मनूस्मृति या ग्रंथाचे त्यांनी जाहीररीत्या दहन केले. तसेच नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये दीनदलितांना प्रवेश मिळवा म्हणून सत्याग्रह केला. तसेच महाडच्या चवदार तळ्यावर पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला. अशा या महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी वंदन करतो असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी उपस्थित माजी आमदार ओमप्रकाशजी पोखरणा, डॉ. राजेंद्र पिपाडा, महावीर पिपाडा, सचिन शिंदे आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button