Letest News
चेंबूर के साईभक्त प्रताप गंगवानी और शिर्डीके सुपुत्र राजेश टिक्यानी शोभा राजेश जाधवानी इनके श्रमसे स... ह.भ.प. संगीताताई पवार यांची हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचं स्पष्ट चार संशयित आरोपींना अटक चेंबूर येथील प्रकाश गंगवाणी व शिर्डी येथील राजेश टिक्यानी शोभा राजेश जाधवानी यांच्या प्रयत्नाने श्री... निमगाव येथील पतसंस्थेच्या पैश्यांचा अपहर करणाऱ्या त्या संचालकांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवणार-सहकार खा... शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महसूल समाधान शिबिरात १३६ दाखल्यांचे वाटप नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उल्हासनगरच्या विजयचे शिर्डी येथून अपहरण वडिलांनी शिर्डी पोलीस स्टेशनला केला गुन्हा दाखल आर बी एल चौकात हाईट ब्यारिगेटला ट्रकची धडक सुदैवाने कोणास इजा नाही  आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन मध्ये मोरीचे घाण पाणी सोडल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल  साईभक्ताची सापडलेली पर्स संस्थान कर्मचारी यांनी केली परत संस्थान कडून त्या कर्मचारीचे सन्मान
खेळ

खरं तर वर्ल्ड कप अमित शाहांचे पुत्र जय शाह यांनी जिंकला आहे खेळाडूंचा सान्मान करताना घडल्याची टीका आझाद यांनी केली

वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर चार दिवस वादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकलेला भारतीय संघ गुरुवारी (4 जुलै 2024 रोजी) पहाटे भारतात दाखल झाला. आधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर ब्रेकफास्ट केल्यानंतर सायंकाळी मुंबईमध्ये चाहत्यांच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा केल्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये संपूर्ण संघाचा सत्कार करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मात्र या संपूर्ण सोहळ्यादरम्यान अनेक चाहत्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पदाधिकारी उगाच प्रकाशझोतात येत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते असं वाटलं. याच मुद्द्यावरुन 1983 साली भारताला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या संघातील माजी क्रिकेटपटूने संताप व्यक्त करत बीसीसीआयचे सचीव जय शाह तसेच संस्थेचे अधिकारी असलेल्या राजीव शुक्ल यांचा उल्लेख करत निर्ल्लजपणे संधीसाधूपणा केल्याचा घणाघात केला आहे.,,


लोकसभेमध्ये पश्चिम बंगालमधील बर्धमान दुर्गापूर येथून चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी वानखेडेवरील सोहळ्यातील दोन फोटो शेअर करत बीसीसीआयच्या पादाधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. जगभरामध्ये कुठेही घडत नाही असा विचित्र प्रकार भारतात खेळाडूंचा सान्मान करताना घडल्याची टीका आझाद यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवरुन केली आहे.

“खरं तर वर्ल्ड कप अमित शाहांचे पुत्र जय शाह आणि राजीव शुक्ल यांनी जिंकला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि भारतीय संघ हा केवळ सहाय्यक होते,” असा उपहासात्मक टोला किर्ती आझाद यांनी लगावला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button