Letest News
चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र! संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर
क्राईमशिर्डी

ऐन निवडणूक काळात कोयता हातात घेऊन फिरणारे दोन तरुण जेरबंद! शिर्डी पोलिसाची कारवाई !

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टिकोनातून शिर्डी पोलिसांच्या माध्यमातून विविध उपाय योजना करण्यात येत असून त्या अनुषंगाने २८ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी सपोनी भारत बलैया हे शिर्डी शहर परीसरात गस्त घालत असताना पोलीस खबरीने दिलेल्या माहितीनुसार दोन तरुण आंबेडकर नगर शिर्डीत हातात कोयता घेऊन आपली दहशत निर्माण करण्यासाठी मी भाई आहे,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मारून टाकू असे म्हणून कोयता हातात घेऊन आरडाओरड करत असल्याची माहिती मिळताच तात्काळ पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने खाजगी वेशात जाऊन त्या ठिकाणी गोंधळ घालत असलेले व हातात धारदार कोयता असलेले दीपक गोरख वाघ वय २२राहणार ,पानमळा शिर्डी व प्रेम सुधाकर शेजवळ २६ राहणार गणेशवाडी शिर्डी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची नाव गाव चौकशी केली असता

त्यांनी वरील प्रमाणे माहिती दिल्यानंतर या दोघांच्या विरोधात शिर्डी पोलिसांनी शस्त्र अधिनियम१९५९ २५,४ पोलीस अधिनियम १३५ ३७(१) ३७(३) शिर्डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आधिक तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुभांर हे करीत आहे. दरम्यान अहिल्या नगर जिल्ह्यात शिर्डी हे एक आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून येथे पोलीस अधीक्षकांचा धाक राहिला नाही.

राजरोसपणे शिर्डीत गुन्हेगार हत्यार घेऊन निवडणूक काळात दहशत माजवत आहेत. शिर्डीत गुन्हेगारीचे किती जाळेमुळे पसरले आहे हे यावरून दिसते. शिर्डीत गुन्हेगारी वाढत चालली आहे. मात्र त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काहीच उपाययोजना पोलिसांकडून केली जात नसल्याचे नागरिक, साई भक्त बोलत आहेत.

ऐन निवडणूक काळात तरी येथे कायदा व सुव्यवस्था आणि शांतता रहावी यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. असेही बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button