Letest News
शिर्डी शहरात देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी साईप्रसादालयात हरवली अंगठी… पण जिंकला विश्वास ६० हजारांची वस्तू प्रामाणिकपणे परत माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये शिर्डी नगरपरिषद प्रथम ७५ लाखांच्या बक्षिसाची मानकरी शिवजयंतीनिमित्त शिर्डीतील जेष्ठ पत्रकार राजेंद्र भुजबळ यांच्या घरी भक्तिभावाने शिवपूजन “लिफ्ट फॉर लाईफ – केटलबेलपासून आत्मविश्वासापर्यंत” शिर्डीतील युवा खेळाडूंना क्रीडा साहित्य वितरण बाबो! शिर्डीत चक्क गावठी कट्टा-‘सिंघम’ अधिकाऱ्यांची विजेच्या वेगात तत्काळ कारवाई! पार्ट–४ : ‘संरक्षण कवच’ की संगनमत? ४१ कोटींच्या सावलीत सिस्टीमच संशयाच्या भोवऱ्यात! सावळीविहीर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ-नागरिक दहशतीत-वनविभाग कुठे झोपला? श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट तर्फे सामुदायिक विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठणास मंगल प्रारंभ शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा दणका! बोगस आयुर्वेदिक दुकान सील
अ.नगरशिर्डी

शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यात अपयशी ठरत असेल तर त्यांचा पन्नास टक्के पगार कमी करावा” केसरकर

शिर्डी (अहिल्यानगर) – “कोकणात उद्योग येण्याला आपला विरोध नाही. मात्र, कोकणातील बागायती क्षेत्राची आणि मासेमारी उद्योगाची हानी न करणाऱ्या उद्योगांची गरज आहे. ही आपली भूमिका कायम आहे”, असे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केला आहे. उद्योगमंत्री असताना उदय सामंत जगभर फिरत असल्यानं त्यांना जगाचा अनुभव आहे. त्यात उपरोधीकपणा काहीच नसल्याची सावरासावर दीपक केसरकर यांनी करत वादावर पडदा टाकला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

माजी मंत्री दीपक केसरकर यांनी 26 डिसेंबर रोजी शिर्डीत येत साईबाबांच्या धुपाआरतीला हजेरी लावलीय. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना केसरकर म्हणाले, ” मंत्री केले नाही म्हणून मी नाराज नाही. कोकण आणि मतदारसंघाच्या विकासासाठी लक्ष केंद्रीत केलं आहे.

आपण शालेय शिक्षण मंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मुंबईत मराठी भवन निर्माण करण्याचा निर्णय घेतला . आपण घेतलेले निर्णय पुढे नेण्याबाबतची भूमिका नवीन शिक्षण मंत्री ठरवतील. मात्र, केरळच्या धर्तीवर मुलांमध्ये स्कील डेव्हलपमेंट प्रोग्रॅम राबवण्याची गरज आहे,” असे केसरकर यांनी सांगितले. “शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यात अपयशी ठरत असेल तर त्यांचा पन्नास टक्के पगार कमी करावा,” अशी अपेक्षा केसरकरांनी व्यक्त केली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button