Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
राजकीयशिर्डी

शिर्डीत वारंवार वीज खंडितीविरोधात संताप- पूर्वसूचना न दिल्यास आंदोलनाचा इशारा

शिर्डी (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी येथे देश-विदेशातून लाखो भाविक श्री साईबाबा यांच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शिर्डीकरांचे आद्य कर्तव्य मानले जाते.
राधाकृष्ण विखे तसेच सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहराच्या विकासाला गती मिळाली असून महावितरण विभागाच्या अनेक समस्या यापूर्वी मार्गी लावण्यात आल्या आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मात्र सध्या वाढत्या उष्णतेमुळे शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. घरगुती वापरासोबतच दुकाने, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. याशिवाय परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही गंभीर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा विनाकारण खंडित करू नये, तसेच तरीही यापुढे पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.


हे निवेदन शिर्डीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई विष्णु थोरात यांच्यासह नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री रोहित तायडे यांना दिले. यावेळी श्री तायडे यांनी विभागातील समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.आवश्यक असल्यास पूर्वसूचना देण्यात यावी, तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करावी आणि नियमित वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button