Letest News
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर - गरीबांच्या मुखातील  अन्न कसा हिरावून घेतो !! सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडें... राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कु... पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर
राजकीयशिर्डी

शिर्डी ते मुंबई अजून एक नवीन ‘वंदे भारत ट्रेन’

शिर्डी : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी (4 ऑक्टोबर) शिर्डीत येऊन साई मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वैष्णव यांनी सांगितलं की, “शिर्डी-मुंबई फास्ट कनेक्टिव्हिटीसाठी

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डी ते नाशिक असा दुहेरी रेल्वे मार्ग टाकण्याच्या आराखड्यावर काम सुरू असून लवकरच या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात होणार. यासोबतच प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वे मार्गही पूर्ण केला जाईल.” तसंच शिर्डी ते मुंबईसाठी दुसऱया ‘वंदे भारत ट्रेन’ची माहिती वैष्णव यांनी दिली.

दरम्यान, शिर्डीहून मुंबईकडं धावणाऱ्या’ ‘वंदे भारत ट्रेन’च्या वेळेत बदल करण्याची मागणी शिर्डी ग्रामस्थ शिवाजी गोंदकर, सचिन शिंदे, चैतन कोते, सुजित गोंदकर यांनी केली. भाविकांना शिर्डीला ये-जा करताना अनेक अडचणी येत आहेत.

तसंच शिर्डी ते मुंबई अजून एक नवीन ‘वंदे भारत ट्रेन’ सुरू करण्याची विनंती ग्रामस्थांनी अश्विनी वैष्णव यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी अश्विनी वैष्णव यांनी ग्रामस्थांच्या निवेदनाला उत्तर देत सर्व मागण्या लवकरच मान्य केल्या जातील,

असं आश्वासन दिलं.साई समाधीच्या दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईबाबांची मूर्ती व शाल देवून मंत्री अश्विनी वैष्णव यांचा सत्कार केला. दरम्यान, अश्विनी वैष्णव यांनी साईबाबांच्या द्वारकामाई व गुरुस्थानचेही दर्शन यावेळी घेतलं. यावेळी साई संस्थानच्या अधिकाऱ्यांसह शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button