Letest News
समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे-आरोपींच्या अडचणी वाढणार अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री-विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करा- जिल्हा महिला व बाल विकास ... अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणाने राहता हादरले संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक शिर्डीत १५ लाखांचे सोने गायब- वॉटर पार्कमधील घटनेने खळबळ-पोलिसांत अद्याप तक्रार नाही 'लाडू प्रसाद कारखाने सील'च्या कथित खोट्या बातमीवर शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल वाचन संस्कार हरवत चालले-मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीबाबत डांगे सरांची खंत साई प्रसादावर संशयाचे काळे ढग-अहवालानंतर फौजदारी कारवाईचे संकेत शिर्डीत खळबळ सावळीविहीर शिवारातील जुगार अड्ड्यावर शिर्डी पोलिसांची धडक-९ आरोपींवर गुन्हा-सुमारे ५ लाखांचा मुद्देम... जालिंदर बोरुडेला ५ दिवसांची पोलीस कोठडी तपासाला वेग
शिर्डी

वादळी पावसाचा तडाखा,एक गायीसह तीन मेंढ्या ठार

कोपरगाव तालुक्यात अवकाळीने थैमान घातले असून काल दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने बक्तरपूर परीसरात वीज पडून एक गायीसह तीन मेंढ्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.एका बाजूला उष्णता आहे तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस कोसळत आहे.दरम्यान हा अवकाळीचा जोर राज्यात आणखी राज्यातील विविध भागात पुढील आठवडाभर म्हणजे १८ मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.कोपरगाव तालुक्याच्या संवत्सरसह पूर्व भागाला चांगले झोडपले असून विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्यामुळे संवत्सर,कोकमठाण या ठिकाणी अनेक नागरिकांच्या घराचे पत्रे उडून गेले असून काही ठिकाणी व्यापारी गाळे उडून मोठे नुकसान झाले आहे.

kamlakar

तर काही ठिकाणी मोठ मोठे वृक्ष विजेच्या तारांवर पडल्यामुळे वीज प्रवाह देखील खंडित झाला होता.तर काल दि.१४ मे रोजी दुपारी झालेल्या पावसाने बक्तरपूर शिवारात पडलेल्या विजेमुळे एक गाय व तीन मेंढ्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या मेंढ्या अन्य भागातील असल्याची माहिती आहे.या शिवाय चासनळी येथील बाळासाहेब देवराम चांदगुडे यांच्या वस्तीचे पत्रे उडून गेले असून त्यांच्या प्रपंच रस्त्यावर आला आहे.

दरम्यान मागील एक महिन्यापासून उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना झालेल्या पावसामुळे तात्पुरता थंडावा मिळाला असला तरी काही नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले असल्याचे व काही मेंढ्या आणि गायींचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान घटनास्थळी बक्तरपूर येथील सरपंच मुक्ताबाई नागरे,ग्रामसेवक श्री.तडवी,तलाठी डी.बी.विधाते,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद कराडे आदींनी भेट दिली असून घटनेचा पंचनामा केला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button