
खासदार लंके यांनी हंगे येथे आज बोलताना दिली. ते म्हणाले की, मॉक पोल घेतला, तरी माझा निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर शंभर टक्के विश्वास आहे. या यंत्रणेमध्ये फेरफार, बदल होत नसतो. लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडविणारी निवडणूक आहे.
या यंत्रणा, मशिन मॅनेज होत असत्या, तर लोकांनी रात्रंदिवस समाजासाठी काम केले नसते. फक्त मशिन मॅनेज केले असते, असा टोलाही लंके यांनी लगावला. एकाही मतदान केंद्रावर गडबड आढळणार नाही. निवडणूक आयोगाची ही यंत्रणा आहे. प्रत्येक मशिन मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्याची तपासणी केली जाते.
मॉक पोल घेतला जातो. त्यानंतर ते मतदान मोजले जाते व त्यानंतरच प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू करण्यात येते. त्यामुळे कोठेही हेराफेरी होणार नाही. मग त्यावर चर्चा कशाला, असा सवाल लंके यांनी केला.
निवडणुकीच्या काळात यंत्रणा मॅनेज करायची आणि निवडणुकीला सामोरे जायचे, असे त्यांचे काम आहे. आता फेरमतमोणीची मागणी म्हणजे रडीचा डाव आहे. आपलं अपयश झाकण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे अशी प्रतिक्रियाही खा. नीलेश लंके यांनी दिली.लंके म्हणाले, ईव्हीएम मशिनबाबत वास्तविक आम्ही तक्रार करायला हवी होती. देशात तुमचे सरकार आणि तुम्हीच यंत्रणेवर अविश्वास दाखवत असाल, तर याचा अर्थ तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाहीत.