Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
राजकीय

तुमची सत्ता उलथून लावल्या शिवाय राहणार नाही विवेक कोल्हे याचा इशारा..

महसूलमंत्री विखेंना युवानेते विवेक कोल्हे यांनी भाषणातून त्यांच्यात बालेकील्यात येऊन केल्या गुदगुल्या

Shirdi News शिर्डी : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर कोपरगाव मतदारसंघातील भाजप युवा नेते विरुद्ध पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यातील कलह अनेकदा समोर आलाय. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कोल्हे यांच्या गटाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतींना पालकमंत्री निधी देताना दूजाभाव असल्याचा आरोप करत युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी आज मोर्चा काढून भाजपच्याच पालकमंत्र्यांवर टीका करून घरचा आहेर दिला आहे.

sai nirman
जाहिरात

2019 साली विधानसभा निवडणुकीत भाजपच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाला होता. आपल्या पराभवाला विखे पाटील कारणीभूत असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला. तेव्हापासूनच कोल्हे विरुद्ध विखे हा संघर्ष अहमदनगर जिल्ह्यात अनेकदा समोर आलाय. 

विवेक कोल्हेंच्या नेतृत्वात मोर्चा

DN SPORTS

मोर्चेकर्‍यांकडून पालकमंत्र्यांचा निषेध

यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकर्‍यांनी पालकमंत्र्यांचा निषेध केला. गरीबी असली की लाजू नये. श्रीमंती आली की माजू नये आणि सत्ता आली की गाजवू नये असा टोला कोल्हे यांनी नाव न घेता विखे पाटील यांना लगावताना यापुढे आंदोलन करणार नाही. मात्र 50 वर्षांची सत्ता उलटवण्यात मी नेतृत्व करेल, असा इशारा कोल्हे यांनी भाषणातून दिला आहे

पालकमंत्री कसा त्रास देतात याचा पाढाच वाचला

आंदोलनानंतर पत्रकारांशी विवेक कोल्हे यांनी संवाद साधताना पालकमंत्री कशा पद्धतीने त्रास देत आहे याचा पाढाच वाचला. भविष्यात वेळ आली तर कोणताही पर्याय निवडू असा थेट इशाराच भाजप पक्ष नेतृत्वाला कोल्हे यांनी दिला आहे. विरोधी सरकार असताना जेवढा त्रास झाला नाही तेवढा सत्तेत असताना होतोय. दलितांच्या हक्काचा निधी डावलला. विखे पाटलांच्या विरोधात गेलेल्या ग्रामपंचायतींना एकही रुपयांचा निधी दिलेला नाही. आमची सत्ता आहे. जिल्हा बँकेत आमचं कर्ज मंजुरीचे पत्र असूनही गणेश कारखान्याला मदत मिळत नाही, असा आरोप विवेक कोल्हे यांनी केला आहे. 

भाजपासाठी काम करतो की विखे पाटलांसाठी हेच कळत नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र त्यांची काय मजबुरी आहे ते कळायला मार्ग नाही. भाजपने आमच्या कडून बूथ कमिटीची कामे करून घेतली आणि सगळा डेटा आज विखे यांच्या कार्यालयात गेला. नेमकं भाजपसाठी काम करतो की विखे पाटलांसाठी हेच आमच्या कार्यकर्त्यांना कळेना झालय. आमच्याकडे काय पर्याय उरतो हे तुम्हीच सांगा. संघर्ष करणार आमचे नेतृत्व आहे. आम्ही गुडघ्यावर बसून पाय चेपण्याचे आमदार आशुतोष काळे सारखे धोरण घेऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात हरू किंवा जिंकू मात्र सत्यासाठी कोणतीही भूमिका घेऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button