पाकिस्तानने काय बांगड्या भरलेल्या नाहीत, नसतील भरल्या तर मग आम्ही भरू.पंतप्रधान मोदी

मोदी म्हणाले, ते काँग्रेसवाले म्हणतायत की, पाकिस्तानने काय बांगड्या भरलेल्या नाहीत, नसतील भरल्या तर मग आम्ही भरू. आता पाकिस्तानला पीठ हवं आहे.
त्यांच्याकडे वीज नाही, हे आम्हाला माहिती होतं. परंतु, पाकिस्तानकडे बांगड्या देखील नाहीत हे माहिती नव्हतं. त्यामुळे आम्ही त्यांच्या हातात बांगड्या भरू.
पंतप्रधान म्हणाले, काहीजण मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानला क्लीनचिट देत आहेत. तर, तेच लोक आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्य सर्जिकल स्ट्राइकवर किंवा एअर स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करत आहेत. हे लोक भारताची आण्विक शस्त्रास्रे संपवण्याचा डाव रचत आहेत.
कधी कधी असं वाटतं की या काँग्रेसवाल्यांनी, इंडिया आघाडीवाल्या लोकांनी भारताविरोधात मोर्चा काढला आहे. त्यांनी कोणाकडून तरी भारताची सुपारी घेतली आहे.
असे हे स्वार्थी लोक राष्ट्ररक्षेसाठी कठोर निर्णय घेऊ शकतात का? अशा संघटना, ज्यांचं काही अस्तित्वच नाही ते भारताला मजबूत बनवू शकतात का? हे लोक भारताला मजबूत नव्हे तर मजबूर करतील.