Letest News
शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर शिर्डीत ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याची तयारी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात शिर्डीत १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या श्रीरामनगर परिसर हादरला साईदर्शनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा शिर्डीत भीषण अपघातात मृत्यू-साईनगरी हळहळली साईदर्शनासाठी आले अन् चोरटय़ाने कारच फोडली-आयटी इंजिनिअरचा लाखोंचा ऐवज लंपास शिर्डीत कारफोडीची दहशत-स... शिर्डीत किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट-भररस्त्यात तरुणाच्या पोटात चाकू खुपसून जीव घेण्याचा प्रयत्न वारंवार तेच आरोपी-तरीही धंदा सुरूच? कल्याणनंतर शिर्डीची पाळी? अवैध देहव्यापाराच्या रॅकेटवर कठोर कारव... रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र निवड समितीवर डॉ. सुरेश हावरे यांची नियुक्ती शिर्डीत शस्त्रतस्करांना पोलिसांचा दणका-स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ-भंडारदरा ४३ टक्क्यांवर निळवंडेतही समाधानकारक पाणीसाठा
राजकीयशिर्डी

ShirdiNews #RickshawIssue#शिर्डीत मीटरविना रिक्षांचा हैदोस-साईभक्तांची सर्रास लूट – प्रशासन झोपेत का?

शिर्डी :
राज्यात ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी शासन विविध योजना राबवत असताना साईनगरी शिर्डीत मात्र पूर्णपणे उलट चित्र पाहायला मिळत आहे. येथे शेकडो रिक्षा मीटरशिवायच धावत असून साईभक्तांकडून उघडपणे मनमानी भाडे उकळून त्यांची सर्रास लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. विशेष म्हणजे ही लूट सर्वांसमोर सुरू असतानाही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दररोज हजारो साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असतात. रेल्वे स्थानक, बसस्थानक, मंदिर परिसर आणि शहरातील प्रमुख चौकांमध्ये रिक्षाचालकांकडून मीटर न लावता थेट भाविकांशी घासाघीस करून भाडे आकारले जात असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी अवघ्या काही अंतरासाठी 200 ते 500 रुपयांपर्यंत भाडे मागितले जात असल्याच्या तक्रारी भाविकांकडून होत आहेत.
नियमांनुसार प्रत्येक ऑटो रिक्षामध्ये मीटर बसविणे बंधनकारक आहे.

मात्र शिर्डीत अनेक रिक्षांमध्ये मीटरच नसल्याचे उघडपणे दिसत आहे. इतकेच नव्हे तर काही रिक्षा परवाना, नोंदणी किंवा अधिकृत कागदपत्रांशिवायच धावत असल्याचीही चर्चा शहरात आहे. त्यामुळे अधिकृत व नियम पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर अन्याय होत असून त्यांची उपजीविकाही धोक्यात आली आहे.


शिर्डी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील धार्मिक पर्यटन स्थळ असताना अशा प्रकारे भाविकांची लूट सुरू असणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब मानली जात आहे. परिवहन विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्त कारवाई करून मीटरविना धावणाऱ्या तसेच बोगस रिक्षांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


दरम्यान, राज्य शासन रिक्षाचालकांच्या कल्याणासाठी योजना राबवत असताना शिर्डीत मात्र नियमांची उघडपणे पायमल्ली होत असताना प्रशासन का गप्प आहे? असा संतप्त सवाल नागरिक व साईभक्तांकडून उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button