Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
राजकीयशिर्डी

“मंत्रालयात पीएन कार्यक्रम करतो, आयोग फक्त स्टँप मारतो!” – थोरातांची टीका तुफान मतमोजणी पुढे ढकलली… दोष मात्र कायम! मतदार याद्यांवरील प्रश्न पुन्हा ऐरणीवर

अहिल्यानगर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता नवा वळण लागलं आहे. मंगळवारी मतदान पार पडत असताना काही ठिकाणी मतदान आणि मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, नागपूर खंडपीठानं मतमोजणीची तारीख थेट 21 डिसेंबर निश्चित करताच राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ माजला आहे. या सगळ्या परिस्थितीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर थेट आणि तुफान हल्ला चढवला.

sai nirman
जाहिरात

“निवडणूक आयोग सत्तेचा गुलाम झालाय!” – थोरातांचा स्फोटक आरोप

थोरात म्हणाले, “निवडणूक आयोगातील अधिकारी हे उच्च दर्जाचे आयएएस आहेत. त्यांनी शेकडो निवडणुका पाहिल्या आहेत… मग असा गोंधळ कसा होऊ शकतो? मंत्रालयातील एखाद्या पीएननं कार्यक्रम बनवला आणि आयोगानं त्यावर शिक्कामोर्तब केलं! आयोगाला कोणाचं तरी बंधन आहे. आता निवडणूक आयोग सत्तेचा गुलाम झालाय — हा आरोप अगदी खरा आहे.”
थोरातांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे.

DN SPORTS

मतदार याद्यांमधील दोषावर थोरातांचा थेट सवाल

मतमोजणी पुढे ढकलण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. पण यावर थोरातांनी पलटवार करत म्हणाले, “मुख्यमंत्री स्वतःवरचं बालट झाकण्यासाठी भूमिका घेत आहेत. अनेक वेळा मतदार याद्यांमधील गंभीर दोष दाखवूनही ते दुरुस्त होत नाहीत. तहसीलदार म्हणतात अधिकार नाहीत… म्हणजे स्पष्टच सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप आहे.”


निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्हे… राज्यातील राजकारण तापलं

न्यायालयाचा निर्णय, आयोगाची भूमिका, याद्यांतील दोष, आणि सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप—या सगळ्यांनी राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. थोरातांच्या या प्रखर टीकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसतायत.

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button