Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
क्राईमराजकीय

अद्वय हिरे यांच्यावर दादा भुसे यांच्या गुंडांनी केला हल्ला रश्मी शुल्का यांची बदली करावी संजय राऊत

काल अद्वय हिरे यांच्यावर दादा भुसे यांच्या गुंडांनी हल्ला केला. अद्वय हिरे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला आणि पोलिसांनी कार्यवाही केली नाही. पोलीस यंत्रणेचा वापर करून अशा पद्धतीने जर हल्ले होत असतील तर या महाराष्ट्रात निवडणुका त्यांना शांततेत पार पाडायच्या नाहीत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या राज्याच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुल्का यांची बदली करावी अशी मागणी आमची यासाठीच होती कारण पोलिस यंत्रणा राजकीय कामाला जुंपलेली आहे. इथल्या पोलीस आयुक्तांची बदली करावी हे मागणी आमची यासाठी होती की इथल्या निवडणुका स्वच्छ वातावरणात होणार नाही हा आमचा अंदाज होता आणि तो खरा ठरतोय, असं संजय राऊत म्हणाले.

विशेष म्हणजे काँग्रेसकडून पदावरून हटवण्यासाठी आग्रही मागणी करण्यात येत आहे. याचदरम्यान, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

नेहमीप्रमाणे होत असलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.दादा भुसे यांच्या त्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांनी ठेचलं त्यामुळे अद्वय हिरे वाचले. अमित शाह बाहेर राज्यात दौरे करून महाराष्ट्रात आम्ही कसे जिंकणार हे सांगत आहेत अशा प्रकारे तुम्ही निवडणुका जिंकणार आहात का? राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करा

अशी मी निवडणूक आयोगाला मागणी करतोय. स्वतःहून कोण अर्ज मागे घ्यायला जात नाही. काही जुन्या केसेस बाहेर काढणार तपासणी करण्याच्या धमक्या देणे अद्वय हिरे यांना पहिल्यापासून धमक्या येत होत्या. काल त्यांच्यावर हल्ला अनेक ठिकाणी आमच्या उमेदवारांना धमक्या दिल्या जात आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button