Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
अ.नगरक्राईम

शाळाही सुरक्षित नाहीत; राहात्यात पोलिसांचा धाक संपलाय का? जि.प. शाळेत घरफोडी-पोलिसी गस्त कुठे होती?

राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, राऊत वस्ती, केलवड बु. येथे झालेल्या घरफोडीने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळेसारख्या संवेदनशील व सार्वजनिक ठिकाणी अज्ञात चोरटे सहज कुलूप तोडून चोरी करतात, याचा अर्थ गाव-वस्त्यांमध्ये पोलिसांचा वचक उरलेला नाही का? असा सवाल नागरिक करत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दुपारी ४ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शाळेचे मुख्य गेट, कार्यालय आणि पाकगृह फोडले जाते, मात्र एकाही टप्प्यावर पोलिसांना संशयास्पद हालचालींची माहिती मिळत नाही, ही बाब चिंताजनक आहे. रात्रीची गस्त नेमकी कुठे होती? गावातील शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक इमारती यांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर आहे,

असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी ठेवलेला धान्यसाठा चोरीला जाणे म्हणजे थेट विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास पळवण्यासारखे आहे. तरीही चोरीनंतरच गुन्हा दाखल होतो, प्रतिबंधात्मक कारवाई कुठे आहे? अज्ञात चोरट्यांचा अद्याप सुगावा लागलेला नसल्याने तपासाची दिशा व गतीवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.
वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून,


👉 रात्रीची गस्त वाढवणार का?
👉 संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त का नाही?
👉 सीसीटीव्ही, ग्रामसुरक्षा समित्या फक्त कागदावरच आहेत का?
असे थेट प्रश्न आता पोलिस प्रशासनाला विचारले जात आहेत.
जर शाळाच सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा तरी कुणाकडून करायची? अज्ञात चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button