Letest News
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा... तत्कालीन अकार्यक्षम पोलीस निरीक्षक दिनेश आहेरचा कारनामा सहा जिवंत काडतूस जमा करून एक काडतूस केला गाय... स्थानिक निवडणुकी साठी शिवसैनिकाणी सज्ज रहा अपहरणं करून डोक्याला बंदूक लावत पन्नास लाखाच्या चेकवर सही करून घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे सुवर्णविजेते पदकचे माणकारी
अ.नगरराजकीय

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच शिर्डी व परिसरातही क्रिकेटच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत केला जल्लोष!

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच शिर्डी व परिसरात क्रिकेटच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला. दुबई येथे झालेल्या या क्रिकेट स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात विजय मिळवताच देशात सर्वत्र मोठा आनंद साजरा करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या अंतिम सामन्यात रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी केली आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले. रोहित शर्माच्या चाणाक्ष नेतृत्वामुळे भारताने न्यूझीलंडला २५१ धावांत रोखले. भारतीय संघ विजयासाठी २५२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि त्यानंतर रो’हिट’ शो सर्वांना पाहायला मिळाला. कारण रोहित शर्माने एकहाती तुफानी फटकेबाजी केली आणि भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

श्रेयस अय्यरनेही यावेळी ४८धावा केल्या खऱ्या, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. पण तरीही भारताने हा सामना जिंकला. भारताचे हे तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद आहे. त्याचबरोबर भारताने न्यूझीलंडचा २५ वर्षांपूर्वीचा बदला या विजयासह घेतला आहे. कारण २००० साली न्यूझीलंडने भारताला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारताने यावेळी चार विकेट्स राखून न्यूझीलंडला पराभूत केले आणि विजेतेपद आपल्या नावावर केले.


न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला खरा, पण पहिल्याच षटकापासून रोहित शर्माने आपले इरादे स्पष्ट केले होते. यावेळी शुभमन गिल हा फक्त रोहित शर्माची फटकेबाजी पाहण्याचे काम करत होता. कारण रोहित शर्मा आपल्या पोतडीतून एकामागून एक फटके काढत होता.

रोहित शर्माने आपले अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करायला लागला होता. रोहितला श्रेयस अय्यर चांगली साथ देत होता. पण यावेळी फिरकीपटूंनी या दोघांवर दडपण आणले आणि रोहित शर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. रोहितने यावेळी सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७६ धावांची दमदार खेळी साकारली.रोहित बाद झाल्यावर श्रेयस अय्यरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली

आणि तो संघाची धावगती वाढवण्याचा प्रयत्न करत होता. पण या नादात त्याने मोक्याच्या क्षणी आपली विकेट बहाल केली. श्रेयसने यावेळी ४८ धावा केल्या. श्रेयस बाद झाल्यावर अक्षर पटेल सेट झाला होता. पण त्यानेही मोठा फटका मारत आपली विकेट सोडली, त्याने २९ धावांची भर टाकली. पण त्यानंतर लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने अंतिम सामन्यात विजय मिळवताच देशात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला. शिर्डी व परिसरातही फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button