Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरक्राईम

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच अवैध धंदे! राहाता शहरात बिंगो-मटका राज उघड्यावर !कारवाईची मागणी — नागरिकांचा संताप

राहाता शहरात कायद्याचा धाक संपला आहे का?
हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाच्या मनात धुमसत आहे. कारण शहराच्या छत्रपती संकुल परिसरात, नगर–मनमाड रोडवर आणि बाजारतळ भागात बिंगो आणि मटका सारखे अवैध धंदे उघड्यावर सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दिवसाढवळ्या, नागरिकांच्या गर्दीत आणि पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच जुगाराचे अड्डे बिनधास्त सुरू आहेत.
महिलांची, विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या भागात मटका टपऱ्या आणि बिंगो केंद्रे निर्भयपणे सुरू आहेत —
आणि पोलीस प्रशासन मात्र शांत!


👁️‍🗨️ “पोलिसांची डोळेझाक की मौन संमती?”

छत्रपती संकुलातील काही गाळ्यांमध्ये आणि मोकळ्या जागेत हे धंदे सुरू असल्याचे नागरिकांनी स्पष्ट सांगितले आहे.
यामागे स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांचे संरक्षण आणि राजकीय पाठबळ असल्याची चर्चा शहरभर आहे.

“कायद्याचे रक्षकच जर मौन धारण करत असतील,
तर गुन्हेगारांना कोण थांबवणार?”
असा सवाल नागरिक सर्रास विचारताना दिसत आहेत.


⚠️ महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

रात्रीच्या वेळी या ठिकाणी संशयास्पद हालचाली, पैशांचा उघड खेळ आणि मद्यधुंद तरुणांची गर्दी यामुळे परिसरात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिलांनाही आता या भागातून जाणे टाळावे लागते.
नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही कारवाई अद्याप शून्यच!


🕵️‍♂️ पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच अवैध धंदे!

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे — हे सर्व राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मतदारसंघातच खुलेआम सुरू आहे.
“पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायद्याचा असा बेभान खेळ?”
असा दाबक्या आवाजात प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.

“वरच्या पातळीवर कुणाचं संरक्षण मिळतंय का?”
असे बोलणे आता कानावर येत आहे.


🚔 कारवाईची मागणी — नागरिकांचा संताप

राहाता शहरात कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे साम्राज्य,
हा प्रश्न आता प्रत्येक नागरिक विचारतोय.

शहरात चालणाऱ्या या बेकायदेशीर धंद्यांवर तात्काळ गंडांतर आणण्यासाठी
नूतन आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे
आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघाचौरे
यांनी स्वतः लक्ष घालून धाडसी कारवाई करावी,
अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.

“जर प्रशासनाने आता तरी कारवाई केली नाही,
तर जनतेचा विश्वास पोलीसांवरून उडेल,
आणि नागरिक रस्त्यावर उतरतील,”
असा इशाराही समाजप्रेमी नागरिक देत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button