Letest News
माजी खासदार विखेंवर अॅड. सुरेश लगड यांचा घणाघाती हल्ला "चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत ठेवा" दैनिक साईदर्शनच्या पाठपुराव्याला यश- पोलीस खात्यातील बोका शंकर चौधरी निलंबित-आता बडतर्फीची मागणी जोर... साईबाबांविरोधातील वक्तव्यावर गौतम खट्टर नमले-राहाता न्यायालयात चूक मान्य-यापुढे आक्षेपार्ह भाष्य करण... घरासमोरच उघडपणे सुरू होता लाखोंच्या उलाढालीचा जुगार अड्डा-स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत रोख रक्कम-मो... दिव्यांगावर दहशत! मारहाण-शिवीगाळ-मोबाईलची तोडफोड- सचिन भैरवकर आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल सावळी विहीरच्या दूध संकलन केंद्रावर एफडीएची धडक कारवाई-परवाना तात्काळ निलंबित साईबाबा रुग्णालयातील स्टाफ नर्स विरुद्ध ७.९० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा शिर्डीत ५५ सभासदांच्या मालमत्तेवर न्यायालयाचा 'ब्रेक' २७.९८ लाखांच्या थकबाकीप्रकरणी विक्री-हस्तांतरण... शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर शिर्डीत ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याची तयारी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात
क्राईमशिर्डी

दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल!

शिर्डी (प्रतिनिधी) दुसरे लग्न केल्याचा पतीला जाब विचारताच पतीने काठी व लाथा बुक्क्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.अशी फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की,सौ. अर्चना प्रसाद कदम रा. निमगांववाडी ता. राहाता यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आपल्या पतीने सुमारे सहा ते सात महिन्यापासुन दुसरे लग्न केले असुन त्यामुळे आमचे मध्ये भांडणे होत असुन त्या भांडणामुळे मी सुमारे दोन महिन्यापासुन मी माझी आई सुनित ज्ञानेदव वेताळ रा. शिक्रापुर ता. पुणे हीचे कडे राहण्यास आहे.


दिनांक 04/02/2025 रोजी मी माझे सासरी निमगांव येथे असतांना सायंकाळी 06/00 वा सुमारास माझे पती -प्रसाद गोरक्ष कदम यांनी दुस-या महिले सोबत मला लपवुन लग्न केल्याचे मला माझ्या सासु सास-यांकडुन समल्याने मी त्यांना त्या बाबत विचारले असता त्यांनी मला शिवीगाळ करुन लाथाबुक्कांनी व तसेच काठीने मारहाण केली.

तरी मी त्या दिवशी रात्रभर सासरीच थांबले व दुस-या दिवशी मी पोलीस स्टेशनला आले होते. त्यावेळी पोलीसांनी मला दवाखान्यात उपाचर कामी पाठवल्यावर मी ग्रामीण रुग्नालय राहाता येथे तपासणी केली होती. व त्या नंतर मी पुन्हा माझे पती व सासु सासरे यांचे मध्ये बदल होईल या आशेने पोलीस स्टेशला तक्रार न देता माझे सासरी गेले.

परंतु माझा नवरा व माझे मध्ये त्यांनी केलेल्या दुस-या लग्नाचे कारणा वरुन वारंवार भांडणे होत असल्याने मी दिनांक 20 मार्च 2025 रोजी माझे माहेरी वेताळ ता. शिक्रपुर जि. पुणे येथे गेले असुन तेव्हा पासुन मी माझे माहेरीच राहत आहे. माहेरी असतांना मला माझे दोन्ही मुले वारंवार फोन करुन आई तुझी आठवण येते असे म्हणत असल्याने मी परत दिनांक 31/05/2025 रोजी सायंकाळी 06/00 वा सुमारास सासरी निमगांव को-हाळे ता. राहाता येथे राहण्यास आले होते.

परंतु मी घरात प्रवेश करताच तेथे माझी सासु-सुनंदा गोरक्ष कदम, सासरे-गोरक्ष पंढरीनाथ कदम यांनी मी घरात गेल्या गेला मला म्हणाले की, ” तु घरात यायचे नाही. तु कशीकाय घरात आली हे आमचे घर आहे. तुझा नवरा येथे नाही. त्याने दुसरे लग्न केले आहे. तु तुझा नवरा आल्यावर काय ते बघ, येथे राहायचे नाही.

त्यावेळी मी मुलगी धनश्री कडे गेली तर मुलगी रडत होती व ती आई तु येथुन जावुन नको असे म्हणत होती. त्यावेळी माझे सासु सासरे माझे सोबत शाब्दीक वाद करुन शिवीगाळ करत होते त्यावेळी मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दोघांनी मला चापटीने मारहाण करुन धक्का बुक्की केली.

अशा आशयाची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल झाले असून शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 613 /2025 नुसार भारतीय न्याय संहीता कलम 118 (एक) 115 (2,)352 /351 (2) ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button