Letest News
शिर्डी परिसरात गुन्हेगारांची दहशत वाढली? भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला “साईंच्या नावावर ऑनलाईन दरोडा! बनावट वेबसाईटने भाविकांची फसवणूक” “साईचरणी ९२ लाखांचा सुवर्ण मुकुट… भक्तीसमोर सोन्यालाही तेज!” “वरून सर्व सेटिंग झाली का?” — शिर्डीतून अंजली दमानियांचा सरकारला थेट सवाल साई चरणी ३५०७ किलो सेंद्रिय केशर आंब्याचे अर्पण भाविकांना तीन दिवस आमरसाची मेजवानी २.१० लाखांची सोन्याची बांगडी सापडली-महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखवली प्रामाणिकता शिर्डीत मोकाट कुत्र्यांचा हैदोस-संस्थान कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला-हरिभाऊ कोते यांचा इशारा ठरला खरा? शिर्डीच्या दोन दमदार व्यक्तिमत्त्वांचा गौरव-विठ्ठलराव पवार आणि दिलीप खरात सन्मानित शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी
क्राईमशिर्डी

साईबाबा संस्थान ही आपली जहागिरी नाही गावाच्या विरोधात जाऊ नका सुभाष कोतकर

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या हवेमध्ये दिसतात .त्यांना वाटतं श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट ही आपली जहांगीरच आहे .असं वाटतं पण ध्यानात ठेवा हे एक फक्त संस्थान आहे जस गावामध्ये एखाद्या मंदिरावर ट्रस्ट बॉडी असते त्या पद्धतीचा श्री साईबाबा संस्थान याच्यावर पण ट्रस्ट बॉडी नेमली जाते

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

गावामध्ये एखादं मंदिर असतं ते मंदिर किंवा ट्रस्ट बॉडी गावाचा मालक होऊ शकत नाही किंवा गावापेक्षा एखाद मंदिर मोठ असू शकत नाही त्याच पद्धतीने श्री साईबाबा संस्थान हे गावांमध्ये आहे श्री साईबाबा संस्थान मध्ये गाव नाही हे पहिले श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी आणि तेथील अधिकाऱ्यांनी ध्यानात ठेवावे कुठलाही निर्णय घेतानी गावाला विश्वासात घेऊनच तो निर्णय श्री साईबाबा संस्थान अमलात आणू शकतात

शिर्डीचा जर इतिहास पाहिला तर आजपर्यंत श्री साईबाबा संस्थान मध्ये गावातील लोकच ट्रस्ट बॉडी मध्ये होते आणि काम पाहत होते हे विसरून चालणार नाही कारण हा सर्व कारभार श्री साईबाबा असतानी श्रीराम नवमी उत्सव दसरा जेवढे पण उत्सव श्री साईबाबांच्या मंदिरात होतात त्यामध्ये गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग असतो हा इतिहास आहे

आणि श्री साईबाबा चरित्रामध्ये पण उल्लेख आहे हे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी ध्यानात ठेवावे श्री साईबाबा पासून आणि श्री साईबाबा संस्थाना पासून गावकऱ्यांना तुम्ही वेगळं पाडू शकत नाही हे ध्यानात राहू द्या नाहीतर इथे खूप अधिकारी आले आणि गेले ज्यांनी गावकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली ते जास्त काळ टिकले नाही हे ध्यानात ठेवावे

गावकरी तो राव काय करी हे म्हनं खरी आहे हे मुख्य कार्य कार्यकारी साहेबांनी विसरू नये आणि तुम्ही एक शासनाने नेमून दिलेले श्री साईबाबा संस्थानच्या देखभालीसाठी नेमलेले एक प्रशासकीय अधिकारी आहात म्हणजे तुम्ही मालक झाले असे समजू नका कुठलाही निर्णय घेताना तुम्हाला शंभर वेळेस विचार करावा लागेल

जे तुमच्या अधिकारात येतात तेच निर्णय तुम्ही घ्या गावाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नका .सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो श्री साईबाबा तुम्हाला चांगली बुद्धी देवो. हीच अपेक्षा सुभाष शामराव कोतकर यांनी या पत्रात म्हटले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button