Letest News
साईनिर्माण परिवार व श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भव्य तीर्थयात्रेला गुरुवारी उत्साहपूर्ण प... समृद्धीवर दरोडा… मागे गुटखा तस्करांचे ‘कनेक्शन’?राहुरीच्या उद्योजकाला लुटणाऱ्या टोळीतील कुख्यात किरण... नव्या जागेवरून सत्ताधारी-विरोधकांत जोरदार जुंपली! चेअरमन विठ्ठलराव पवारांचा विरोधकांवर घणाघात राहाता शहरात मावा-गुटख्याचा काळाबाजार उघड! स्थानिक गुन्हे शाखेचा छापा-तिघांविरुद्ध गुन्हा-अवैध तंबाख... चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र!
अ.नगरराजकीय

शेतकरी संरक्षण कायद्यासाठी भारतीय जनसंसदेचे लक्षवेध आंदोलन ३१ डिसेंबरला अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर ठिय्या

अहिल्यानगर | प्रतिनिधी
“प्रामाणिक परिश्रम म्हणजेच प्रखर राष्ट्रनिर्मिती” या ब्रीदवाक्याअंतर्गत सहभाग प्रबोधन रचना भारतीय जनसंसद यांच्या वतीने शेतकरी संरक्षण कायदा लागू व्हावा, यासाठी येत्या ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे रात्रभर लक्षवेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात हा लढा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
🟩 हमीभाव, कर्जमाफी आणि पिकविमा — शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या
आंदोलनामध्ये सर्व पिकांच्या हमीभावात वाढ करून हमीभावापेक्षा कमी दराने विक्री झाल्यास भावांतर योजनेतून थेट अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच बंद करण्यात आलेली जुनी प्रधानमंत्री पिक विमा योजना त्वरित सुरू करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच थकबाकीदार व नियमित कर्जदार असा भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.
🟨 दिव्यांग शेतकरी, शेततळी आणि कुंपणासाठी १००% अनुदानाची मागणी
दिव्यांग शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे १०० टक्के अनुदानावर सर्व योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी आंदोलनात करण्यात आली आहे.
याशिवाय शेततळ्यांचे आकारमान वाढवून अनुदानात वाढ करावी, तसेच बिबटयाप्रवण गावांमध्ये १०० टक्के अनुदानावर शेतीला कुंपण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
🟦 वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीस तात्काळ व वाढीव भरपाई द्या
बिबट्यांना जंगलात सुरक्षित राहू द्यावे, मात्र मानवी वस्तीतील बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आंदोलकांची आहे.
तसेच वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई वाढवून ती देण्याची कार्यपद्धती सुलभ करावी, अशीही प्रमुख मागणी आंदोलनात करण्यात आली आहे.
📍 आंदोलनाची माहिती
🗓 दिनांक : ३१ डिसेंबर
⏰ वेळ : रात्रभर
📌 स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर
📞 संपर्क :
९४२२०८३२०६ / ९४२१४४००८२

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button