Letest News
पार्ट–२ : १४ वर्षे लेखापरीक्षण… तरी ४१ कोटींचा गैरव्यवहार कसा अदृश्य? साईनगरीत बोगस आयुर्वेदिक औषधांचा भांडाफोड-भाविकाची ११-४०० रुपयांची फसवणूक महाशिवरात्रीच्या दिवशी शिर्डीच्या शिवावर मास विक्रीवरून तणाव वादातून हातघाई-पोलिसांची तातडीची कारवाई कोपरगावच्या आगीचा इशारा-शिर्डीत गॅस हातगाड्यांचा वाढता धोका? पहाटेच्या काकड आरतीने महाशिवरात्री उत्सवाची मंगल सुरुवात-बेलपत्र अर्पण-शंकर प्रतिमा स्थापना-मंदिर पर... फिर्यादीच चौकशीच्या रडारवर? लेखापरीक्षकांवर ठेवीदारांचे गंभीर सवाल- संचालक-सहकार खाते की ऑडिट यंत्रण... आठ लाखांहून अधिक किमतीची भक्तीची भेट-साईभक्त धनराज मुंडे यांचे भावपूर्ण दान भक्ती-सेवा आणि समाधानाचा संगम!शिर्डी येथे ‘श्री साई परिक्रमा’ उत्साहात-भाविकांसाठी मोफत थंड पेय व पा... आर्थिक ताणात बार व्यवसाय-बाऊन्सर फंड्याला वेग परिसरात नव्या पद्धतीचा ट्रेंड उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ स्पर्धा जाहीरराज्य शासनाकडून गुणवंत पत्रकारांचा सन्मान
अ.नगरक्राईम

बोगस वैद्यकीय व्यावसासिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करा

Detect bogus medical professionals and take strict action against them

अहमदनगर दि. 22 ऑगस्ट (जि.मा.का):- जिल्ह्यातील मुला-मुलींच्या लिंगगुणोत्तराचे प्रमाण समान राहील यादृष्टीने गावपातळीवर मुलींच्या जन्माविषयी नागरिकांच्या विचारात बदल होण्याकरीता जनजागृती करावी. जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.

sai nirman
जाहिरात
        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आरोग्य विभागाच्या विविध योजना तसेच समित्यांच्या  आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रंसगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.

        यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, पीसीपीएनडीटी समितीच्या अशासकीय सदस्य श्रीमती डॉ सुधा कांकरिया, गणेश बोऱ्हाडे, शासकीय अभियोक्ता ॲड सतीष पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

        जिल्हाधिकारी श्री सालीमठ म्हणाले की, मुला-मुलींच्या लिंगगुणोत्तराचे प्रमाण समान राहील यादृष्टीने गावपातळीवर मुलींच्या जन्माविषयी नागरिकांच्या विचारात बदल होण्याकरीता जनजागृती करावी. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, ए. एन. एम. नर्स यांची याकामी मदत घेण्यात यावी. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा समितीमध्ये समावेश करण्यात यावा. जिल्ह्यात विनानोंदणी तसेच अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर विनाविलंब कारवाई करत त्यांच्यामध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्याच्या सक्त सुचनाही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी केल्या.

        आपला जिल्हा 2025 पर्यंत क्षयमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक दक्षपणे काम करावे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील कुटूंबांच्या तपासण्या करण्यात याव्यात. जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व परिसर तंबाखुमुक्त करण्यासाठी परिसरामध्ये चालविण्यात येणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

        यावेळी जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान, रुग्णकल्याण समिती, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण आदींचाही संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. बैठकीस संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button