Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरराजकीय

मुंबईत कोरोना!दोघांचा मृत्यू!तरी अधिक काळजी घेण्याची गरज!

शिर्डी ( प्रतिनिधी) सन २०१९ आणि त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोविडने पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. वाढत्या कोविड रुग्णांमध्ये, मुंबईत केईएम रुग्णालयात दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. या दोन्ही रुग्णांचे कोविड रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

परंतु रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे की एका रुग्णाचा मृत्यू कर्करोगामुळे झाला. तर, दुसऱ्याचा किडनीच्या गंभीर आजाराने झाला आहे. तथापी डॉक्टर आणि बीएमसी अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्यास सांगितले आहे. आणि लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे.

परळ येथील ५९ वर्षीय महिलेचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. महिलेला कर्करोग होता, रुग्णालयाने मृतदेह कुटुंबाला देण्यास नकार दिला. कुटुंबाने माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्याशी संपर्क साधला. अनिल कोकीळ म्हणाले की, महिलेला कर्करोग होता, परंतु तिचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला.

अशा परिस्थितीत, रुग्णालयाने प्रोटोकॉलनुसार मृतदेह कुटुंबाला दिला नाही. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी बोलल्यानंतर, मृतावर कोविड प्रोटोकॉलनुसार कुटुंबातील फक्त दोन सदस्यांसह भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यामुळे परत कोरोना येतो की काय? अशी भीती नागरीकांना वाटत आहे.तरी यापुढे प्रशासन,आरोग्य विभाग,व नागरीकांनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे.असे बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button