Letest News
चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र! संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर
अ.नगरराजकीय

विखे कुटुंबाचे राजकारण हे संपत आलेले आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी राहाता तालुक्यातील अनेक गावातील मतदारांच्या गाठीभेठी घेत आहेत. या वेळी तालुक्यातील अनेक नागरिकांनी सुजय विखे यांच्याकडून बेताल वक्तव्य केले जात असून त्या काहीच तथ्य नसते. परंतु त्यामुळे वातावरण तणावग्रस्त होत असल्याच्या बाबी अनेकांनी घोगरे यांच्या निदर्शात आणून दिल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

kamlakar

घोगरे म्हणाल्या, निवडणुका या आपण केलेल्या पाच वर्षांच्या कामावर तसेच येणार्या काळात काय कामे करणार आहे, या मुद्दांवर होत असतात. परंतु संगमनेर व राहाता तालुक्यातील सभांमध्ये माजी खासदार सुजय विखे हे बेताल वक्तव्य करीत आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याने तरुणांसह कार्यकर्त्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे. त्यांनी बेताल वक्तव्य करणे थांबवावे, अन्यथा आम्ही त्यांना जशाच तसे भाषणातून उत्तरे देऊ, असा इशारा घोगरे यांनी दिला आहे.

घोगरे म्हणाल्या की, विखे कुटुंबावर आम्हाला बोलण्याची इच्छाही नाही. पण सुजय विखे यांच्या बेताल वक्तव्यामुळे आम्हाला बोलण्याची वेळ आली आहे. विखे कुटुंबाचे राजकारण हे आता संपत आलेले असून ते संपविण्यासाठी सुजय विखे असल्यानंतर दुसरी कोणाची गरज नाही. सुजय विखेच विखे घराण्याचे राजकारण बेताल वक्तव्याने संविणार आहे. हे सांगण्याची कोणा भविषगाराची गरज नाही, असे घोगरे म्हणाल्या.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button