Letest News
अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन एसएस हॉटेल मधील बलात्कार व फसवणूक प्रकरणात जगताप यांची शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्... श्रीरामपूरच्या गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा! १६ गंभीर गुन्ह्यांतील 'सोन्या बेग' अखेर जेरबंद प्रेमाच्या जाळ्यात पाच वर्षे अडकवून लाखोंची फसवणूक? लग्नाचे आमिष-शारीरिक संबंध आणि 13 लाखांसह 3 तोळे... कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो... दीड लाखांचे दागिने आणि व्हिसा असलेली पर्स साईभक्ताला सुखरूप परत । सोन्याचे दागिने-व्हिसा अन् प्रामाण... कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंद... २२ महिने उलटले… तरीही ५९८ कामगारांना सेवा लाभ नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडे डॉ. राजेंद्र पिपाडांची न...
राजकीयशिर्डी

शिर्डीची कन्या भाग्यश्री जोगंस (गुरव) जालना महानगरपालिकेच्या नगरसेविका

शिर्डी | प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिर्डी शहराची कन्या भाग्यश्री सुजीत जोगंस (गुरव) यांनी भाजपच्या उमेदवारीवर प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत नगरसेविका म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या दणदणीत यशामुळे शिर्डी शहरात तसेच गुरव समाजात समाधान व आनंदाचे वातावरण पसरले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

भाग्यश्री जोगंस (गुरव) यांनी भाजपच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवलेल्या विविध विकासकामांमुळे मतदारांचा विश्वास संपादन केला असून, जनतेने त्यांना महानगरपालिकेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे.
त्या शिर्डी साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत उर्फ नाना गुरव यांच्या पुतणी असून, स्वर्गीय दीपक गुरव यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या राजकीय यशामागे कुटुंबाची सामाजिक पार्श्वभूमी, जनतेशी असलेला थेट संपर्क आणि कार्यकुशलतेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.


विजयानंतर प्रतिक्रिया देताना नगरसेविका भाग्यश्री जोगंस (गुरव) म्हणाल्या की,
“साईबाबांचा आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम यामुळेच हा विजय मिळू शकला. तसेच आमदार बबनराव लोणीकर यांच्या पाठबळामुळे मला ही संधी मिळाली. जालना शहराच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी मी प्रामाणिकपणे काम करेन.”

त्यांच्या या विजयाबद्दल शिर्डी व जालना परिसरातून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button