Letest News
सावळी विहीरच्या दूध संकलन केंद्रावर एफडीएची धडक कारवाई-परवाना तात्काळ निलंबित साईबाबा रुग्णालयातील स्टाफ नर्स विरुद्ध ७.९० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा शिर्डीत ५५ सभासदांच्या मालमत्तेवर न्यायालयाचा 'ब्रेक' २७.९८ लाखांच्या थकबाकीप्रकरणी विक्री-हस्तांतरण... शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर शिर्डीत ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याची तयारी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात शिर्डीत १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या श्रीरामनगर परिसर हादरला साईदर्शनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा शिर्डीत भीषण अपघातात मृत्यू-साईनगरी हळहळली साईदर्शनासाठी आले अन् चोरटय़ाने कारच फोडली-आयटी इंजिनिअरचा लाखोंचा ऐवज लंपास शिर्डीत कारफोडीची दहशत-स... शिर्डीत किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट-भररस्त्यात तरुणाच्या पोटात चाकू खुपसून जीव घेण्याचा प्रयत्न वारंवार तेच आरोपी-तरीही धंदा सुरूच? कल्याणनंतर शिर्डीची पाळी? अवैध देहव्यापाराच्या रॅकेटवर कठोर कारव...
राजकीय

राज्याचे गृहमंत्री युजलेस:- राऊत

वरळी हिट अँड रन प्रकरणावर बोलताना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच फैलावर घेतलं. मुख्यमंत्र्यांनी वरळी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर केलीय,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावरुनही संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ती महिला काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे? असा परखड सवालच संजय राऊतांनी विचारला आहे. तसेच, मी वैयक्तिक टीका करत नाही, पण राज्याचे गृहमंत्री युजलेस आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही खडे बोल सुनावले आहेत. तसेच, निर्दयीपणे कावेरी नाखवांना चिरडलं गेलं, ती तुमची लाडकी बहीण नाही का? असं म्हणत राऊतांनी थेट हल्ला चढवला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, “जोपर्यंत वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि त्यांचं कुटुंबीय यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत तुमच्या 10 लाखांना किंमत नाही. त्यांचा जीव 10 लाखांचा आहे का? असं काय झालं की, मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत,

ते काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे की, खोकेवाले आहेत ते? आले की, पैसे वाटायचे, याला वाटा, त्याला वाटा. कायदा-सुव्यवस्था या राज्यात नग्न झालेली आहे, चिरडून मरतेय. राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तीगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहेत. आतापर्यंत एवढी भीषण दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्यांकडून साधं निवेदन नाहीतर, साधी संवेदनाही नाही.”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button