Letest News
शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ... शिर्डीत धारदार शस्त्र बाळगल्याने दोन आरोपींवर गुन्हा दाखल! साईभक्ताची 51 लाखाची फसवणूक केल्या प्रकरणी शिर्डी येथील कुमावत वर दिल्लीतील भक्ताने केला गुन्हा दाखल प्रवेशद्वाराजवळ पूजेचे साहित्य खरेदी केल्याचे बिल दाखवल्यानंतरच पूजेचे साहित्य मंदिरात नेण्यास परवान... sshirdi news उभ्या दोन ट्रक मधून रात्री डिझेलची चोरी करणाऱ्या तिघांना अटक! त्यात सावळीविहीरचे दोन तर...
अ.नगरराजकीय

एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं, अनेक प्रवाशांच्या मृत्यूची भीती

गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार या विमानात 242 प्रवासी होते. रिपोर्टनुसार, विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही प्रवास करत होते. 100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. विमान जेथे कोसळले तो एक निवासी भाग होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


विजय रुपाणी हे 2016 ते 2021 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2014 ते 2016 या कालावधीत ते कॅबिनेट मंत्री होते. 2006 ते 2012 या कालावधीत रुपाणी हे राज्यसभा सदस्य होते. 2016 मध्ये त्यांनी भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. 1996 ते 1997 मध्ये ते राजकोटचे महापौर होते.टेकऑफ करताना एअर इंडियाचे विमान क्रॅश झाले आहे.

विमान दुर्घटना ही इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. विमान दुर्घटनाग्रस्त झालेल्या परिसरात अग्निशामक दलाच्या पाच गाड्या पोहचल्या असून तेथे आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.या दुर्घटनेनंतर पीएम मोदी आणि अमित शाह हे अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेन पटेल यांच्याशी या दुर्घटनेसंबंधी चर्चा केली असून त्यांनी राज्याला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

भारतात, मृत्यू किंवा दुखापत झाल्यास विमान कंपन्यांचे दायित्व आंतरराष्ट्रीय अधिवेशनांद्वारे नियंत्रित केले जाते जसे की मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन, 1999, ज्यावर भारताने स्वाक्षरी केली आहे. याअंतर्गत, विमान कंपन्या खालीलप्रमाणे भरपाई करण्यास जबाबदार आहेदोष काहीही असो, मृत्यू किंवा शारीरिक दुखापत झाल्यास प्रति प्रवाशासाठी 128,821 विशेष ड्रॉइंग राइट्स (SDRs) (सुमारे 1.4 कोटी रुपये) पर्यंत.


त्याचवेळी, विमान कंपनीचा निष्काळजीपणा असल्याचे सिद्ध झाल्यास त्या मर्यादेपेक्षा जास्त भरपाई देखील द्यावी लागू शकते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button