Letest News
वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर
राजकीयशिर्डी

वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन

शिर्डी प्रतिनिधी : वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर महिला भगिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिर्डी उपविभागीय पोलीस विभागाने विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली असून, महिलांनी पूजेसाठी जाताना आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

वटपौर्णिमेनिमित्त मोठ्या संख्येने महिला वडाच्या पूजेसाठी घराबाहेर पडत असतात. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच महिलांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डीवायएसपी अमोल भारती व शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी विविध सूचना जारी केल्या आहेत.

पोलीस प्रशासनाने महिलांना शक्यतो एकटीने न जाता गटाने जाण्याचा सल्ला दिला आहे. पूजेसाठी जाताना वाहतुकीचे नियम पाळावेत, गर्दीच्या ठिकाणी विशेष सतर्कता बाळगावी तसेच अनोळखी व संशयास्पद व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

DN SPORTS

याशिवाय दागिने, मोबाईल, पर्स, रोख रक्कम यांसारख्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेण्याचे सांगण्यात आले असून, अनावश्यक महागडे दागिने परिधान करणे टाळावे, असेही सूचित करण्यात आले आहे. विशेषतः चेन स्नॅचिंगच्या घटना टाळण्यासाठी महिलांनी गळ्यातील दागिने उघडपणे न घालता सुरक्षित ठेवावेत, असे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.

kamlakar

तसेच लहान मुलांना सोबत आणल्यास त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे, मोबाईल फोन पूर्णपणे चार्ज ठेवावा आणि घरातील सदस्यांचे संपर्क क्रमांक जवळ ठेवावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी पिण्याचे पाणी सोबत ठेवावे व आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर किंवा 100 या पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

“आपली सुरक्षा हीच आमची प्राथमिकता”

वटपौर्णिमेनिमित्त महिला भगिनींनी सुरक्षिततेस प्राधान्य देत पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन डीवायएसपी अमोल भारती व पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button