
हता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली असून त्यांची कर्जत पोलिस ठाण्यात बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. अनेक गंभीर प्रकरणांमध्ये निष्क्रियता, तक्रारदारांना मिळणारी दुय्यम वागणूक तसेच वाढत्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वरिष्ठ पातळीवर सातत्याने पोहोचत होत्या.विशेष म्हणजे राहता शहर हादरवून टाकणाऱ्या १२ वर्षीय चिमुरड्याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणानंतर नागरिकांचा संताप प्रचंड वाढला होता. सोशल मीडियापासून रस्त्यापर्यंत पोलिस प्रशासनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. अखेर नागरिकांच्या आक्रोशानंतर आणि वरिष्ठ स्तरावरील वाढत्या तक्रारींमुळे चव्हाण यांची उचलबांगडी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दैनिक साई दर्शन ने देखील वेळोवेळी राहता पोलिस ठाण्यातील अकार्यक्षमता, वाढती गुन्हेगारी, सर्वसामान्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि काही अधिकाऱ्यांच्या संशयास्पद कारभारावर सातत्याने प्रकाश टाकला होता. नागरिकांच्या भावना आणि वास्तव परिस्थिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम दैनिक साई दर्शन ने निर्भीडपणे केले. या बातम्यांची गांभीर्याने दखल घेत नूतन जिल्हा पोलीस प्रमुखांनी अखेर कठोर निर्णय घेतल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
राहता शहराची बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, वाढते अवैध धंदे, टोळक्यांचा वाढता वावर आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीतीची भावना लक्षात घेता, येथे आता कर्तव्यदक्ष, दबंग आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करणारा अधिकारी नियुक्त करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. “राहता शहराची प्रतिमा पुन्हा उंचावायची असेल तर फक्त बदली करून चालणार नाही, तर गुन्हेगारीवर वचक निर्माण करणारा धडाडीचा अधिकारी येथे देणे गरजेचे आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दैनिक साई दर्शनची ठाम मागणी 🚨
“फक्त उचलबांगडी करून चालणार नाही…!
राहता शहरातील वाढती गुन्हेगारी, नागरिकांच्या तक्रारींकडे केलेले दुर्लक्ष, गंभीर प्रकरणांमध्ये दाखवलेली टाळाटाळ आणि पोलिस ठाण्यातील संशयास्पद कार्यपद्धती यांची सखोल चौकशी झालीच पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी,” अशी ठाम मागणी दैनिक साई दर्शन ने केली आहे.
“राहता शहराला केवळ नवीन अधिकारी नव्हे, तर कायद्याचा धाक निर्माण करणारा दबंग आणि पारदर्शक अधिकारी हवा,” अशी भावना संतप्त नागरिकांतून व्यक्त होत आहे.
दैनिक साई दर्शनची आक्रमक भूमिका ⚠️
“एका निष्पाप १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी कुटुंबीयांना संघर्ष करावा लागतो, ही अत्यंत संतापजनक बाब आहे. गंभीर प्रकरणात वेळेत गुन्हा दाखल न होणे, तपासात झालेली टाळाटाळ आणि पोलिस प्रशासनाची निष्क्रियता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.”
यासोबतच राहता शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. आर्थिक देवाण-घेवाण करून काही अवैध व्यवसायांना अभय दिले गेले का? असा सवाल आता नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत. शहरात वाढलेले गुन्हे, टोळक्यांचा वाढता वावर, नशेखोरी, दहशत आणि सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली भीती ही प्रशासनाच्या निष्क्रियतेचीच परिणती असल्याची चर्चा आहे.
फक्त बदली करून जबाबदारी संपणार नाही…
राहता पोलिस ठाण्यातील मागील काळातील सर्व गंभीर प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. कोणाच्या आशीर्वादाने अवैध धंदे फोफावले? कोणत्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली? आणि कोणामुळे शहराची कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली? याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी दैनिक साई दर्शन ने केली आहे.
“राहता शहराला आता फक्त अधिकारी नको, तर कायद्याचा धाक निर्माण करणारा दबंग, प्रामाणिक आणि जनतेसाठी लढणारा अधिकारी हवा,” अशी संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
दैनिक साई दर्शनचा निर्भीड आवाज अखेर ठरला प्रभावी! 🚨
राहता शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्यांना मिळणारे अभय, सर्वसामान्य नागरिकांवर होणारा अन्याय आणि एका निष्पाप मुलाच्या मृत्यूप्रकरणी दाखवलेली निष्क्रियता याविरोधात सर्वप्रथम दैनिक साई दर्शन नेच आवाज उठवला होता. या निष्क्रिय कारभाराविरोधात सातत्याने बातम्या प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम दैनिक साई दर्शन ने केले.
या गंभीर बाबींची दखल घेत नूतन पोलीस अधीक्षकांनी अखेर संबंधित लाचखोर आणि अकार्यक्षम अधिकाऱ्याची बदली करून ठोस पाऊल उचलल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. नागरिकांच्या भावना आणि वाढता संताप लक्षात घेत प्रशासनाने घेतलेला हा निर्णय म्हणजे जनआक्रोशाचा विजय मानला जात आहे.
मात्र, फक्त बदली करून विषय संपणार नाही…
संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्व संशयास्पद प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी ठाम मागणी दैनिक साई दर्शन ने केली आहे.
दैनिक साई दर्शनचा इशारा 🚨
“एका निष्पाप मुलाच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांना दोषी धरून पोलीस अधीक्षकांनी कठोर कारवाई करावी. केवळ बदली करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होऊ नये. या संपूर्ण प्रकरणातील जबाबदार अधिकारी व संबंधितांवर विभागीय चौकशीसह कठोर प्रशासकीय कारवाई झालीच पाहिजे,” अशी ठाम भूमिका दैनिक साई दर्शन ने घेतली आहे.
जर या गंभीर प्रकरणात योग्य आणि पारदर्शक कारवाई झाली नाही, तर दैनिक साई दर्शन वरिष्ठ पोलीस अधिकारी व संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
“निष्पाप मुलाला न्याय आणि राहता शहराला सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील,” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

