
hirdi : साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेची हमी देणारी साईनगरीच आता चोरट्यांच्या तावडीत गेली आहे का? असा संतप्त सवाल काल (दि. २५ एप्रिल) घडलेल्या थरारक चैन स्नॅचिंग प्रकरणानंतर उपस्थित झाला आहे. अंधार, वीज खंडित आणि पोलिसांची निष्क्रियता… या तिन्ही गोष्टींचा “परफेक्ट गेम” खेळत दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी आंध्र प्रदेशातील महिला साईभक्त रत्नकुमारी वैंकट्टा यांच्या गळ्यातील तब्बल १५ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि चैन क्षणार्धात लुटून पळ काढला.
⚡ वीज गेली… आणि चोरट्यांचा प्लॅन फत्ते!
घटना घडली ती शिर्डी नगर–मनमाड रस्त्यावर, जिथे भाविकांची वर्दळ कायम असते. गुंटूर-तेणाली येथून आलेले वैंकट्टा कुटुंब दर्शन आटोपून साईआश्रमकडे पायी निघाले होते. त्याच वेळी संपूर्ण परिसरात वीजपुरवठा खंडित… अंधार दाटलेला… आणि हेल्मेट घातलेले दोन चोरटे दुचाकीवर येतात, थेट महिलेच्या गळ्यावर झडप घालतात आणि १५ लाखांचा ऐवज हिसकावून क्षणार्धात फरार होतात!
👉 हा प्रकार “रँडम चोरी” नसून पूर्णपणे रेकी करून केलेला कट असल्याची चर्चा रंगली आहे.
🚨 पोलीस ‘अलर्ट’ की ‘अॅब्सेंट’?
Shirdi Police Station चे पो.नि. रणजित गलांडे आणि त्यांच्या पथकाने मागील काही महिन्यांत गुन्हेगारीवर अंकुश आणल्याचे चित्र होते. मात्र ही घटना म्हणजे त्या दाव्यांवर थेट प्रश्नचिन्ह!
शहरात इतकी मोठी घटना घडते…
अंधारात चोरटे मोकाट फिरतात…
आणि कोणत्याही यंत्रणेला खबर लागत नाही?
👉 मग हा “कडक बंदोबस्त” नेमका कागदावरच आहे का?संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कोठे गायब?
शिर्डी पोलीस स्टेशन — गस्त कुठे होती?
नगरपरिषदेचे पोलीस पथक — उपस्थित होते का?
LCB (स्थानिक गुन्हे शाखा) — तपासात सक्रिय की सुस्त?
शहर वाहतूक पोलीस — फक्त दंड वसुलीतच व्यस्त?
👉 भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न एवढा हलका झाला आहे का, की लाखोंची लूट होऊनही कोणी जबाबदार नाही?
😡 भाविकांची सुरक्षा धोक्यात — श्रद्धेवरच घाला!
या घटनेमुळे शिर्डीची प्रतिमा धुळीस मिळण्याची भीती व्यक्त होत आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जर रस्त्यावरच लुटले जात असेल, तर “सुरक्षित साईनगरी” हा दावा किती खोटा आहे हे उघड झाले आहे.
स्थानिक युवकांनी तत्परतेने मदत केली, पण प्रश्न प्रशासनाचा आहे — घटना घडल्यानंतर धावणे नव्हे, ती होऊच न देणे ही जबाबदारी नाही का?“शालजोडी” नव्हे… आता कडक कारवाईच हवी!
स्थानिक नागरिक, व्यापारी आणि भाविकांमध्ये तीव्र संताप उसळला असून
पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ हस्तक्षेप करून या चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
👉 “साईनगरीत भक्त लुटले जात असतील, तर ही केवळ चोरी नाही… तर प्रशासनाच्या अपयशाची उघडी चिठ्ठी आहे!”
⚠️ आता प्रश्न एकच — पोलिस आणि प्रशासन जागे होणार, की पुढचा नंबर कोणाचा?

