
नाशिक : भोंदूगिरी आणि गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांमुळे चर्चेत असलेला अशोक खरात याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. न्यायालयाने त्याला पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने तपास यंत्रणांना अधिक चौकशीसाठी वेळ मिळाला आहे.
सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयात अत्यंत खळबळजनक दावा केला. अशोक खरात याने तब्बल ५ नरबळी दिल्याचा संशय असल्याचे त्यांनी नमूद केले. या दाव्यामुळे संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनले असून राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.
तपास यंत्रणांकडून सध्या या दाव्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी सुरू आहे. खरातच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती, त्याचे आर्थिक व्यवहार, तसेच त्याच्या कथित ‘भोंदूगिरी’च्या जाळ्याचा तपास वेगाने सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलीस कोठडी वाढल्यामुळे तपासाला नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत.
👉 या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

