Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगरराजकीय

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ-‘एकच वादा अजितदादा’ घोषणांनी राजभवन दुमदुमले

मुंबई | प्रतिनिधी
कुटुंबावर कोसळलेले अपार दुःख, राजकीय पोकळी आणि पक्षाचे भवितव्य या सगळ्यांवर धीरोदात्तपणे मात करत सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी ठीक पाच वाजता राजभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यासह महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची नोंद झाली आहे.
शपथविधीच्या वेळी त्यांनी दिवंगत अजित पवार यांना स्मरून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी उपस्थित आमदार, मंत्री, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थक भावूक झाले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


“एकच वादा अजितदादा… अजितदादा अमर रहे” अशा घोषणांनी राजभवनाचा सेंट्रल हॉल अक्षरशः दुमदुमून गेला.
देवगिरीवरून राजभवनाकडे भावनिक वाटचाल
शपथविधीपूर्वी सुनेत्रा पवार यांनी शासकीय निवासस्थान ‘देवगिरी’ येथे स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नम्र अभिवादन केले. काही क्षण मौन पाळून त्यांनी राजभवनाकडे प्रस्थान केले.


शपथ घेण्याआधीही त्यांनी अजित पवार यांना मनोमन नमन करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार यांचे आशीर्वाद घेऊनच आपण या जबाबदारीला सुरुवात करत आहोत, अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
दुःखातून उभारी, पक्षासाठी धाडसी पाऊल
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर पक्षावर मोठे संकट ओढावले होते. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत पक्षाची धुरा हाती घेतली.


पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी त्यांनी हे जबाबदारीचे पद स्वीकारल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
महिला नेतृत्वाचा नवा अध्याय
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात महिला नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. राजकारणात संयम, शांतता आणि ठाम निर्णयक्षमता यांचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. उपमुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेतून त्या राज्याच्या विकासाला नवी दिशा देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button