Letest News
अबब! साई संस्थान हादरले — संस्थानमधील ४७ कर्मचाऱ्यांनी साईबाबांच्या झोडीत हात घातला”“शेवटी साईबाबांच... पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ...
क्राईमशिर्डी

दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल!

शिर्डी (प्रतिनिधी) दुसरे लग्न केल्याचा पतीला जाब विचारताच पतीने काठी व लाथा बुक्क्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.अशी फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की,सौ. अर्चना प्रसाद कदम रा. निमगांववाडी ता. राहाता यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आपल्या पतीने सुमारे सहा ते सात महिन्यापासुन दुसरे लग्न केले असुन त्यामुळे आमचे मध्ये भांडणे होत असुन त्या भांडणामुळे मी सुमारे दोन महिन्यापासुन मी माझी आई सुनित ज्ञानेदव वेताळ रा. शिक्रापुर ता. पुणे हीचे कडे राहण्यास आहे.


दिनांक 04/02/2025 रोजी मी माझे सासरी निमगांव येथे असतांना सायंकाळी 06/00 वा सुमारास माझे पती -प्रसाद गोरक्ष कदम यांनी दुस-या महिले सोबत मला लपवुन लग्न केल्याचे मला माझ्या सासु सास-यांकडुन समल्याने मी त्यांना त्या बाबत विचारले असता त्यांनी मला शिवीगाळ करुन लाथाबुक्कांनी व तसेच काठीने मारहाण केली.

तरी मी त्या दिवशी रात्रभर सासरीच थांबले व दुस-या दिवशी मी पोलीस स्टेशनला आले होते. त्यावेळी पोलीसांनी मला दवाखान्यात उपाचर कामी पाठवल्यावर मी ग्रामीण रुग्नालय राहाता येथे तपासणी केली होती. व त्या नंतर मी पुन्हा माझे पती व सासु सासरे यांचे मध्ये बदल होईल या आशेने पोलीस स्टेशला तक्रार न देता माझे सासरी गेले.

परंतु माझा नवरा व माझे मध्ये त्यांनी केलेल्या दुस-या लग्नाचे कारणा वरुन वारंवार भांडणे होत असल्याने मी दिनांक 20 मार्च 2025 रोजी माझे माहेरी वेताळ ता. शिक्रपुर जि. पुणे येथे गेले असुन तेव्हा पासुन मी माझे माहेरीच राहत आहे. माहेरी असतांना मला माझे दोन्ही मुले वारंवार फोन करुन आई तुझी आठवण येते असे म्हणत असल्याने मी परत दिनांक 31/05/2025 रोजी सायंकाळी 06/00 वा सुमारास सासरी निमगांव को-हाळे ता. राहाता येथे राहण्यास आले होते.

परंतु मी घरात प्रवेश करताच तेथे माझी सासु-सुनंदा गोरक्ष कदम, सासरे-गोरक्ष पंढरीनाथ कदम यांनी मी घरात गेल्या गेला मला म्हणाले की, ” तु घरात यायचे नाही. तु कशीकाय घरात आली हे आमचे घर आहे. तुझा नवरा येथे नाही. त्याने दुसरे लग्न केले आहे. तु तुझा नवरा आल्यावर काय ते बघ, येथे राहायचे नाही.

त्यावेळी मी मुलगी धनश्री कडे गेली तर मुलगी रडत होती व ती आई तु येथुन जावुन नको असे म्हणत होती. त्यावेळी माझे सासु सासरे माझे सोबत शाब्दीक वाद करुन शिवीगाळ करत होते त्यावेळी मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दोघांनी मला चापटीने मारहाण करुन धक्का बुक्की केली.

अशा आशयाची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल झाले असून शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 613 /2025 नुसार भारतीय न्याय संहीता कलम 118 (एक) 115 (2,)352 /351 (2) ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button