Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरराजकीय

मुंबईत कोरोना!दोघांचा मृत्यू!तरी अधिक काळजी घेण्याची गरज!

शिर्डी ( प्रतिनिधी) सन २०१९ आणि त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोविडने पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. वाढत्या कोविड रुग्णांमध्ये, मुंबईत केईएम रुग्णालयात दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. या दोन्ही रुग्णांचे कोविड रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

परंतु रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे की एका रुग्णाचा मृत्यू कर्करोगामुळे झाला. तर, दुसऱ्याचा किडनीच्या गंभीर आजाराने झाला आहे. तथापी डॉक्टर आणि बीएमसी अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्यास सांगितले आहे. आणि लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे.

परळ येथील ५९ वर्षीय महिलेचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. महिलेला कर्करोग होता, रुग्णालयाने मृतदेह कुटुंबाला देण्यास नकार दिला. कुटुंबाने माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्याशी संपर्क साधला. अनिल कोकीळ म्हणाले की, महिलेला कर्करोग होता, परंतु तिचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला.

अशा परिस्थितीत, रुग्णालयाने प्रोटोकॉलनुसार मृतदेह कुटुंबाला दिला नाही. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी बोलल्यानंतर, मृतावर कोविड प्रोटोकॉलनुसार कुटुंबातील फक्त दोन सदस्यांसह भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यामुळे परत कोरोना येतो की काय? अशी भीती नागरीकांना वाटत आहे.तरी यापुढे प्रशासन,आरोग्य विभाग,व नागरीकांनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे.असे बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button