कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीत येवून साई समाधीचं दर्शन घेतलं.

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीत येवून साई समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे यांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्यानंतर सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं. कुणबी प्रमाणपत्रही दिलं. सगे सोयरे यांचे राहीले आहे त्याला वेळ लागतो. कारण सगे सोयरे यांची व्याख्या करणं आवश्यक आहे. ती संविधानाला धरुन व्हावी, जरांगे जे मागताय ते देतांना आरक्षण टिकलं पाहीजे. हा प्रामाणिकपणा राज्य सरकारने दाखवलेला आहे. जरांगेच स्वता एशी टक्के प्रश्न सुटल्याचं ते म्हणातात, राहीलेल्यासाठी त्यांनी सरकारला वेळ द्यावा असं माझ म्हणणं आहे. शाह यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, त्या दोन मोठ्या व्यक्तीनी बोलल्यानंतर मी बोलावं इतका मोठा व्यक्ती नाही. मला या विषयावर आता काही बोलायच नाही.