Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
राजकीय

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबद्दल शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

मुंबई | अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली होती. या फुटीनंतर अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. या सोबतच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला होता. या दाव्यावर आता निवडणूक आयोग येत्या 6 ऑक्टोबरला सुनावणी घेणार आहे. या सुनावणी आधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं विधान केले आहे. या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

sai nirman
जाहिरात

राष्ट्रवादी कोणाची याबद्द्ल बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी माझ्यासाठी सामान्य माणसाचा विचार महत्वाचा आहे, असे म्हणत जनतेला खरी परिस्थिती माहीती आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? हे सामान्यांना माहिती आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार हे आळंदीमध्ये भागवत वारकरी संमेलनात सहभागी झाले. या वेळी त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच दर्शनही घेतले. नियोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील संघर्षाबद्दल हे महत्वाचे विधान केले.

DN SPORTS

दरम्यान, सध्या शिवरायांच्या वाघनख्यांवरुन नवा वाद सुरू झाला आहे. लंडनमधून आणली जाणारी वाघनखे शिवरायांची नसल्याचा दावा काही इतिहासकारांसह राजकीय नेत्यांनी केला आहे. यावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच उत्तर दिले. मला याबद्दल काही ज्ञान नाही. मात्र वाघनख्यांबद्दल वाद नको.. असे शरद पवार यावेळी म्हणाले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button