Letest News
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा... तत्कालीन अकार्यक्षम पोलीस निरीक्षक दिनेश आहेरचा कारनामा सहा जिवंत काडतूस जमा करून एक काडतूस केला गाय... स्थानिक निवडणुकी साठी शिवसैनिकाणी सज्ज रहा अपहरणं करून डोक्याला बंदूक लावत पन्नास लाखाच्या चेकवर सही करून घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे सुवर्णविजेते पदकचे माणकारी
अ.नगरराजकीय

श्रीराम आणी स्वामी समर्थ यांच्या विषयी बोलणाऱ्या मूर्ख महारावं चा व जाणत्या नेत्यांचा निषेध हिंदू समाजाने करावा

कळस (प्रतिनिधी):

sai nirman
जाहिरात

प्रभू श्रीराम व स्वामी समर्थ यांच्या विषयी बोलणाऱ्या मूर्ख महारावं व त्यांच्या वक्तव्याला मुक संमती देणाऱ्या जाणत्या नेत्याचा निषेध हिंदू समाजाने केला पाहिजे असे स्पष्ट मत जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान नेवासा चे मठाधीपती ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केले. महारावं व त्यांचे स्टेज वर असणाऱ्या नेत्यांचा भाविकांनी दोन्ही हात वर करून निषेध केला.

DN SPORTS


अमृतवाहिनी प्रवरामातेच्या तीरावर वसलेल्या ब्रह्मलीन प.पू. सुभाष पुरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र कळस बु येथे अखंड हरिनाम सप्ताह मध्ये काल्याचे कीर्तनात निरूपण करताना बोलत होते.

kamlakar

यावेळी अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त विष्णू महाराज वाकचौरे, गणेश महाराज वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, भाजपा सोशल मीडिया सेल चे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, उपसरपंच केतन वाकचौरे आदी उपस्थित होते.


मंडलिक महाराज हे बोलताना म्हणाले, हिंदू धर्म सहिष्णू असल्याने हिंदू धर्माची टिंगल करण्याचे षडयंत्र राबवले जात आहे. धर्मनिरपेक्षता ही बेगडी असून ती फक्त हिंदू धर्मा विरोधात राबविली जाते.

हिंदू धर्मातील देव देवता, साधू संत यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अपप्रवृत्ती चा व ज्यांच्या समोर केला असे वक्तव्य केले ते महाराष्ट्रातील स्वतःला जाणते नेते म्हणून घेणाऱ्या च्या मुक संमतीचा निषेध हिंदू समाजाने केला पाहिजे.

धर्म आणी संस्कृतीला बाधा आणण्याची खोटी धर्मनिरपेक्षता बेगडी आहे. यात फक्त हिंदू धर्माला लक्ष केल जात.
हिंदू धर्म कोणत्याही जातीचा द्वेष करत नाही. भारत भूमी नेहमी विश्व बंधुत्वाचा संदेश देत असते. हिंदू धर्मातून निर्माण झालेले धर्म, पंथ यांचा सुद्धा राग केला नाही.

जाती पाती मध्ये भांडणे लावून फुट पाडण्याचे काम केले जात आहे. देश सुरक्षित राहण्यासाठी संस्कृती टिकली पाहिजे यासाठी हिंदू समाज संघटित झाला पाहिजे.
आपल्या देशाच्या चोहो बाजूनी अपप्रवृत्ती असून अमेरिका, चिन, पाकिस्तान आपले देशाला हानी पोहचविण्याचे काम करीत आहे.

गीता , गाथा यांचे ज्ञान आपल्या पुढील पिढीला मिळाले पाहिजे. तरुणांनी कोणाचे दास न होता राजकारणा पासून दूर राहिले पाहिजे, तरुणी नी आपला जोडीदार निवडताना त्यांचे संस्कार पाहिले पाहिजे. झगामगत्या दुनिया च्या नादी लागू नये. आभासी जगाच्या मागे पळू नका असा मंडलिक महाराज यांनी सल्ला दिला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button