Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
Blog

दहावी बोर्डाचा निकाल जाहीर

2023- 2024 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या शालान्त परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra SSC 10th Results) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी राज्यातील हा निकाल जाहीर केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिक्षण मंडळाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्याचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला. यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेमध्ये दमदार कामगिरी करत कोकणातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली. कोकण विभागाच्या यंदाच्या निकालाची आकडेवारी आहे 99.01 टक्के. शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार या वर्षीसुद्धा निकालावर मुलींचच वर्चस्व पाहायला मिळालं.

यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळानं एटीकेटीची तरतूद केली आहे. ज्यामुळं अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं एक वर्ष व्यर्थ जाणार नाहीय. दहावीच्या एखाद्या विद्यार्थ्याला एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण होता आलं नाही तरीही ते विद्यार्थी इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र असतील.

यंदाच्या वर्षी जून महिन्यात त्या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश घेता येणार आहे. पण, अकरावीचा अंतिम निकाल लागण्याआधी विद्यार्थ्यानं दहावीच्या अनुत्तीर्ण विषयांची परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण होणं अपेक्षित असेल.

शालेय शिक्षण मंडळाच्या या सुविधेमुळं यंदा 26 हजार विद्यार्थ्यांना एटीकेटीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती जारी करण्यात आली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button