Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
अ.नगरराजकीय

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड समोर आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात चर्चा रंगल्या असताना अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मनसे आणि शिवसेना बालेकिल्ल्यात समान जागा वाटून घेणार आहे. दरम्यान उर्वरित महानगरासाठी 60:40 चा फॉर्म्युला स्वीकारण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार हे आता जवळपास निश्चित झालं असून फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे.

दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना जागांच्या यादी तयार करण्यास सांगण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्या युतीची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना (यूबीटी) आणि मनसे यांच्यातील औपचारिक युती दिवाळीच्या आसपास जाहीर होऊ शकते,

जेव्हा महापालिका निवडणुकीचा पहिला टप्पा होण्याची शक्यता आहे. तसंच शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यातही ही घोषणा केली जाऊ शकते असं बोललं जात आहे. शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (बीएमसी २०२५) युती होण्याची शक्यता आहे.

ही युती ठाकरे घराण्यातील दोन बंधूंच्या एकत्र येण्याने राजकीय समीकरणे बदलू शकते. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर (जसे हिंदी सक्ती विरोध) दोघे एकत्र आले असून, यामुळे बीजेपी-शिंदे गटाला आव्हान मिळू शकते. युती झाल्यास मुंबईतील मराठी मतदारांचा फायदा होईल, पण मनसेचा निवडणुकीतील इतिहास मर्यादित असल्याने फायदा किंवा तोटा याबाबत चर्चा आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button