Letest News
वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!” “शिर्डी-राहात्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ- पिपाडा यांचा अप्रत्यक्ष निशाणा विखेंवर!” “राजकीय वरदहस्तामु... सावळी विहीरमध्ये घरफोडीचा थरार- कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ ! शिर्डीत भरदिवसा रक्तरंजित थरार- दुकानदारावर जीवघेणा हल्ला कॉकरोच जनता पार्टी”मुळे देशभरात बेरोजगारांचा संताप उफाळला-८ मिलियन तरुण एकवटले! साई संस्थानवर गंभीर...
अ.नगरराजकीय

बांधावरून मारहाण,आरोपींना तीन वर्षांची शिक्षा

कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील शेतीचा बांध कोरल्याच्या कारणावरून तीन जणांना लोखंडी पाईपने केलेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले होते यात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने यातील आरोपी व्यंकटेश सोमनाथ वलटे,सोमनाथ सीताराम वलटे मीना सोमनाथ वलटे आदी तीन जणांना कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांनी ०३ वर्षांची शिक्षा प्रत्येकी ०५ हजारांचा दंड ठोठावला आहे.त्यामुळे असामाजिक तत्वांना असे गंभीर गुन्हे करताना चारवेळा विचार करावा लागणार असल्याची प्रतिक्रिया सामाजिक वर्तुळातून उमटली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी दत्तात्रय आबासाहेब वलटे आणि आरोपी सोमनाथ सीताराम वलटे हे चुलते पुतणे आहे.त्यांच्यात शेतीच्या बांधावरून वाद आहेत.दरम्यान फिर्यादी दातत्रय वलटे हे आपले वडील आबासाहेब वलटे आई सिंधुताई वलटे आदी दिनांक ०९ जुलै २०२० रोजी सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास घरासमोर उभे असताना त्या ठिकाणी आरोपी व्यंकटेश सोमनाथ वलटे,

सोमनाथ सीताराम वलटे मीना सोमनाथ वलटे आदी तीन जण आले व फिर्यादी व त्याचे घरातील अन्य सदस्यांना म्हणू लागले की,”तुम्ही आमच्या शेतीचा बांध का कोरला ?” असा जाब साल करून आरोपी सोमनाथ वलटे यांनी आपल्या हातातील लाकडी दांडा फिर्यादीची आई सिंधूबाई वलटे हिच्या डोक्यात मारला होता.व्यंकटेश वलटे याने आपल्या हातातील लोखंडी पाईपने फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यात प्रहार केला केला होता.

त्यात ते गंभीर जखमी झाले होते.त्यांना सोडविण्यासाठी फिर्यादी मुलगा गेला असता त्यांनी त्यांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.त्यात दोघं जण जखमी झाले होते.त्यानंतर त्यांनी मीना वलटे हिलाही पाईपने मारहाण केली होती.फिर्यादी आणि त्यांचे आई वडील गंभीर जखमी झाल्यावर आरोपी घटनास्थळावरून निघून गेले होते.त्यानंतर जखमींना लोणी येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते.

दरम्यान या प्रकरणी फिर्यादी दत्तात्रय वलटे याने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.३२७/२०२० भा.द.वी.कलम ३२६,३२५,३२४,३२३,५०४,५०६,३४(१) प्रमाणे पोलिस अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण करून आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्हा कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी यांचेसंमोर सुनावणी साठी दाखल झाला होता.या प्रकरणाची नुकतीच सुनावणी पूर्ण झाली होती त्यात सरकारी वकील प्रदीप रणधीर यांनी फिर्यादीचे वतीने जोरदार बाजू मांडली होती तत्यात न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्या.भगवान पंडित यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून आरोपी व्यंकटेश सोमनाथ वलटे,सोमनाथ सीताराम वलटे मीना सोमनाथ वलटे आदी तीन जणांना दोषी धरून ०३ वर्षाची शिक्षा व प्रत्येकी ०५ हजारांचा दंड ठोठावला आहे.त्यामुळे या निकालाचे कारवाडी आणि परिसरात स्वागत होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button