ऊस वाहतूक वाहन ठरतात यमदूत…….
सावळीविहीर प्रतिनिधी/ – शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते शिर्डी लगत सावळीविहीर गाव आहे या मार्गाने मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत येतात गावातुन नगर मनमाड रस्ता आहे लगत शिर्डी सिन्नर रस्ता आहे हाकेच्या अंतरावर समृद्धी महामार्ग आहे हा परिसरात नेहमी गजबजलेला असतो ऊस कारखाना सुरू होताच दरवर्षी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर, बैलगाडी, ऊस वाहतूक करतात हे वाहन चालक बेजबाबदारपणे रात्रीच्या वेळेस चालताना लाल रेडियम लावताना दिसत नाही तसेच ऊस वाहतूक वाहनांवर लाल रेडियम कपडा लावत नाही शिवाय या वाहनाला लाईट नसतात कधी एकच बंल्प चालू असतो
तर हातात बॅटरी घेऊन वाहन चालवताना दिसतात तसेच व्यसनाच्या अजगरी विळख्यात अल्पवयीन चालक भरदार वेगाने वाहन चालवतात यामुळे अपघात होतात अंधारात अंदाज न आल्याने अपघात होतात या रस्त्यावर काहींना अपंगत्व आलेले आहे तर काहींनी जीव गमावला आहे

अनेकांना हे ऊस वाहतूक वाहन यमदूत ठरतात या वाहन चालकावर कारवाई होण्याची गरज आहे साखर कारखान्याचे योगदान महत्त्वाचे आहे या वाहनधारकांना रस्ता सुरक्षा मार्गदर्शन करणे आवश्यक आहे यामुळे अपघात होणार नाही दरवर्षी साईभक्तासह पंचक्रोशीतुन येणाऱ्या माणसांचा या ठिकाणी अपघात होतात याला जबाबदार केवळ ऊस वाहतूक वाहन आहे तसेच वाहतूक प्रमाणापेक्षा जास्त असते रस्त्यावर ट्रॅक्टर अपघात होतात या वाहनांवर दंडात्मक कारवाई होण्याची गरज असुन वाहनचालकांना शिक्षा होणे काळाची गरज आहे यामुळे रस्त्यावर सुरक्षित आहे असे सामान्य माणसाला वाटेल या वाहनांवर कारवाई होण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे