Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरराजकीय

शिवरायांचे आदर्श व संपूर्ण चरीत्राचे आचरण आजच्या तरुण पिढीने आत्मसात कऱणे गरजेचे – सौ.ममता पिपाडा

[17:05, 19/2/2025] Gadkari: शिवरायांचे आदर्श व संपूर्ण चरीत्राचे आचरण आजच्या तरुण पिढीने आत्मसात कऱणे गरजेचे – प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने बोलताना व्यक्त केले. यावेळी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा,आरपीयाचे दिलीपराव वाघमारे,मदनलाल पिपाडा,प्रगतशील शेतकरी शिवाजी आनप,महावीर पिपाडा,मदन तारगे,निखील पिपाडा,लिलाबाई पिपाडा आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ.ममता पिपाडा पुढे म्हणाल्या की,ज्यांचे नाव घेताच शत्रुच्या पायाखालची वाळु घसरावी तसेच राज्य कसे चालवावे हा आदर्श संपूर्ण देशासमोर ठेवणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. अशा या शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण सर्वांनी जन्म घेतला हे आपले हे आपले भाग्य आहे. एका गर्जनेतुन दिल्लीचे सिंहासन हलविण्याची ताकद शिवरायांच्या आवाजात होती. अतिशय कल्पक बुद्धी,शत्रुशी दोनहाथ कऱण्यासाठी गणीमीकावे,शत्रुचे मनसुबे धुळीस मिळविण्यात निश्नात होते. रयतेला सोबत घेवुन सुराज्यातून स्वराज्याची संकल्पना मनात ठेवून परकिय आक्रमणातुन राज्याचे व रयतेचे संरक्षण करणारे एकमेव राज्यकर्ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हेच होते.

sai nirman
जाहिरात

शिवरायांनी अवघे आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी वेचले. मावळ्यांना सोबत घेवुन त्यांनी अनेक गड किल्ले जिंकले. जिजाऊंच्या शुरविरांच्या गोष्टींतुन प्रेरना घेवुन अल्पवयात सर्वच कलांमध्ये पारंगत होवुन राज्याचे सुत्र हातात घेवुन उत्तम शासक बनले. त्यांच्या विचारांची, साहस व धाडसाची,बुद्धीची जयंती साजरी होणे खुप गरजेचे आहे. शिवरायांच्या काळात कुठल्याही राजाने लढाई जिंकली की त्या राज्यातील संपत्ती व स्त्रीयादेखील त्याच्या व्हायच्या. ही क्रूर प्रथा शिवरायांनी बंद केली. त्यांनी शत्रुंच्या स्त्रियांचादेखील आदर केला. त्यांना सुरक्षितता प्रदान केली. आज पावलोपावली महिलांवर अत्याचार, अन्याय होत आहे. जो तरूण शिवरायांना वाचेल, तो तरूण कधीही कुठल्याही परस्त्रीचा अनादर करणार नाही.

    यावेळी उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवाजी महारांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन केले.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button