गुरूपौर्णिमा उत्सवासाठी मुंबईतून पायी चालत निघालेल्या तीन साई भक्तांचा वाटेतच एक चार चाकी वाहनाची धडक बसून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे साईभक्तांवर शोककळा पसरली आहे.
कल्याण तालुक्यातील हे तीन साईभक्त गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त टिटवाळाच्या मांडा टिटवाळा येथून पायी जाणाऱ्या शिर्डी पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. मात्र ही पदयात्रा सिन्नर नजीक येताच एका चार चाकी वाहनाने या तिघांना धडक दिली आणि त्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अपघातानंतर ते तिघे राहत असलेल्या ठिकाणी शोककळा पसरलीये. भावेश पाटील, रविंद्र पाटील,साईराज भोईर असे या अपघातात मुत्यू झालेल्या साईभक्तांची नावे आहेत, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत गाडी चालकाचा तपास सुरू केला आहे तसेच वाहन चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृतांच्या कुटुंबायांनी केली आहे.